AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“कांताराचा बॉलिवूड रिमेक नकोच”; असं का म्हणाला ऋषभ शेट्टी?

ऋषभ शेट्टीचा 'कांतारा'च्या हिंदी रिमेकला नकार; तुम्हालाही पटणार त्याने दिलेलं कारण!

कांताराचा बॉलिवूड रिमेक नकोच; असं का म्हणाला ऋषभ शेट्टी?
KantaraImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 30, 2022 | 6:51 PM
Share

मुंबई- ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा’ हा चित्रपट या वर्षातील ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. सुरुवातीला ‘कांतारा’ हा कन्नड भाषेत प्रदर्शित झाला होता. मात्र चित्रपटाचा वाढता प्रतिसाद पाहून नंतर तो विविध भाषांमध्ये डब करून प्रदर्शित करण्यात आला. 14 ऑक्टोबर रोजी या चित्रपटाचा हिंदी व्हर्जन प्रेक्षकांच्या भेटीला आला. बॉक्स ऑफिसवर अजूनही ‘कांतारा’ला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. हा चित्रपट हिंदीत डब केल्यापासून ऋषभला अनेकदा त्याच्या हिंदी रिमेकविषयी प्रश्न विचारण्यात येत आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ऋषभने त्यावर स्पष्ट उत्तर दिलं आहे.

“अशा पद्धतीची भूमिका साकारण्यासाठी तुम्हाला तुमची संस्कृती आणि रुढी-परंपरांविषयी पूर्ण विश्वास असायला हवा. हिंदी फिल्म इंडस्ट्रीत मोठे कलाकार आहेत, जे मला आवडतात. पण मी मला रिमेकमध्ये काहीच रस नाही”, असं ऋषभ म्हणाला.

‘कांतारा’च्या ऑस्कर एण्ट्रीविषयी प्रश्न विचारला असता तो पुढे म्हणाला, “मी त्याबद्दल आताच 25 हजार ट्विट्स पाहिले आहेत. मला त्याचा आनंद आहे. पण त्यावर मला प्रतिक्रिया द्यायची नाही. कारण मी या यशासाठी काम केलं नाही. तर मी माझ्या कामासाठी काम केलं आहे.”

‘कांतारा’ हा मूळ कन्नड भाषेतील सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. त्या शब्दाचा अर्थ रहस्यमयी जंगल असा होतो. जंगलच्या देवतेला कन्नड भाषेत ‘कांतारे’ म्हटलं जातं. त्यावरून या चित्रपटाचं नाव ‘कांतारा’ असं देण्यात आलं आहे. या चित्रपटाचा बजेट फक्त 20 कोटी रुपये आहे. मात्र बॉक्स ऑफिसवर आता त्याने जवळपास 250 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु
चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु.
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?.
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा.
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ.
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत.
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित.
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर.
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न.