AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“कांताराचा बॉलिवूड रिमेक नकोच”; असं का म्हणाला ऋषभ शेट्टी?

ऋषभ शेट्टीचा 'कांतारा'च्या हिंदी रिमेकला नकार; तुम्हालाही पटणार त्याने दिलेलं कारण!

कांताराचा बॉलिवूड रिमेक नकोच; असं का म्हणाला ऋषभ शेट्टी?
KantaraImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 30, 2022 | 6:51 PM
Share

मुंबई- ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा’ हा चित्रपट या वर्षातील ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. सुरुवातीला ‘कांतारा’ हा कन्नड भाषेत प्रदर्शित झाला होता. मात्र चित्रपटाचा वाढता प्रतिसाद पाहून नंतर तो विविध भाषांमध्ये डब करून प्रदर्शित करण्यात आला. 14 ऑक्टोबर रोजी या चित्रपटाचा हिंदी व्हर्जन प्रेक्षकांच्या भेटीला आला. बॉक्स ऑफिसवर अजूनही ‘कांतारा’ला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. हा चित्रपट हिंदीत डब केल्यापासून ऋषभला अनेकदा त्याच्या हिंदी रिमेकविषयी प्रश्न विचारण्यात येत आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ऋषभने त्यावर स्पष्ट उत्तर दिलं आहे.

“अशा पद्धतीची भूमिका साकारण्यासाठी तुम्हाला तुमची संस्कृती आणि रुढी-परंपरांविषयी पूर्ण विश्वास असायला हवा. हिंदी फिल्म इंडस्ट्रीत मोठे कलाकार आहेत, जे मला आवडतात. पण मी मला रिमेकमध्ये काहीच रस नाही”, असं ऋषभ म्हणाला.

‘कांतारा’च्या ऑस्कर एण्ट्रीविषयी प्रश्न विचारला असता तो पुढे म्हणाला, “मी त्याबद्दल आताच 25 हजार ट्विट्स पाहिले आहेत. मला त्याचा आनंद आहे. पण त्यावर मला प्रतिक्रिया द्यायची नाही. कारण मी या यशासाठी काम केलं नाही. तर मी माझ्या कामासाठी काम केलं आहे.”

‘कांतारा’ हा मूळ कन्नड भाषेतील सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. त्या शब्दाचा अर्थ रहस्यमयी जंगल असा होतो. जंगलच्या देवतेला कन्नड भाषेत ‘कांतारे’ म्हटलं जातं. त्यावरून या चित्रपटाचं नाव ‘कांतारा’ असं देण्यात आलं आहे. या चित्रपटाचा बजेट फक्त 20 कोटी रुपये आहे. मात्र बॉक्स ऑफिसवर आता त्याने जवळपास 250 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक