AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विवाहित असतानाही सलमान खानच्या वडिलांनी हेलनशी का केलं दुसरं लग्न? अखेर सोडलं मौन

सलीम खान यांनी दोन लग्न केले आहेत, हे सर्वश्रुत आहेच. त्यांनी 18 नोव्हेंबर 1964 रोजी सुशीला चरक (आता सलमा) यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र विवाहित असतानाही सलीम यांचं अभिनेत्री हेलनशी अफेअर सुरू होतं.

विवाहित असतानाही सलमान खानच्या वडिलांनी हेलनशी का केलं दुसरं लग्न? अखेर सोडलं मौन
Salim and Salman KhanImage Credit source: Twitter
| Updated on: Feb 03, 2023 | 1:02 PM
Share

मुंबई: बॉलिवूड अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता अरबाज खानचा नवीन शो ‘द इन्विसिबल विथ अरबाज खान’ सध्या चर्चेत आहे. या शोच्या नव्या एपिसोडचा टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. या शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये अरबाजचे वडील सलीम खान हे पाहुणे म्हणून उपस्थित राहिले आहेत. या एपिसोडमध्ये त्यांनी त्यांच्या व्यावसायिक आणि खासगी आयुष्याविषयी बऱ्याच गोष्टी उलगडून सांगितल्या आहेत.

सलीम खान यांनी मुलासमोर त्यांच्या दोन लग्नाविषयीही मोकळेपणे भाष्य केलं. सलीम खान यांनी दोन लग्न केले आहेत, हे सर्वश्रुत आहेच. त्यांनी 18 नोव्हेंबर 1964 रोजी सुशीला चरक (आता सलमा) यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र विवाहित असतानाही सलीम यांचं अभिनेत्री हेलनशी अफेअर सुरू होतं. त्यानंतर 1981 मध्ये त्यांनी हेलनशी दुसरं लग्न केलं. विवाहित असताना दुसरं लग्न का केलं, याविषयी अखेर सलीम खान यांनी मौन सोडलं आहे.

हेलन यांच्यासोबतच्या नात्याबद्दल अरबाजने जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा सलीम खान म्हणाले, “ती तरुण होती, मीसुद्धा तरूण होतो. माझा काही चुकीचा उद्देश नव्हता. मी तिच्या मदतीसाठी हात पुढे केला होता. तो एक भावनिक प्रसंग होता, जे कोणासोबतही घडलं असतं.”

वडिलांचं ऐकल्यानंतर अरबाजने स्वत:चाही अनुभव सांगितला. “या त्याच गोष्टी आहेत ज्यामुळे मी वडिलांवर नाराज होऊ शकलो असतो. ते आता माझ्या आयुष्यात घडतंय. कोणत्याही गोष्टीला समजण्यासाठी वेळ हा खूप मोठा फॅक्टर असतो”, असं अरबाज म्हणाला.

1980 च्या दशकात सलीम खान आणि हेलन यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा होत्या. सलीम खान यांनी हेसुद्धा सांगितलं की त्यांचं हेलनसोबतचं नातं सर्वांनीच स्वीकारलं नव्हतं. सलीम आणि हेलन यांनी अर्पिला खानला दत्तक घेतलं होतं. तर पहिल्या लग्नातून सलीम यांना चार मुलं आहेत. सलमान, अरबाज, सोहैल आणि अलविरा ही त्यांची चार मुलं आहेत.

या शोमध्ये सलीम खान यांनी सलमासोबतच्या पहिल्या भेटीचाही किस्सा सांगितला. “आम्ही आधी लपूनछपून एकमेकांशी भेटायचो. मी सलमाला जेव्हा सांगितलं की मला त्यांच्या कुटुंबीयांशी भेटायचं आहे, तेव्हा सर्वजण मला बघण्यासाठी आले होते. जणू एखाद्या प्राणीसंग्रहालयात नवी प्राणी आला असावा, त्या पद्धतीने ते मला बघत होते”, अशा शब्दांत त्यांनी मजेशीर किस्सा सांगितला.

या टीझरमध्ये अरबाज आणखी एका प्रसंगाविषयी बोलताना दिसतो. “ज्यावेळी तुम्ही विभक्त झालात, तेव्हा मला आठवतंय की माझा अपघात झाला होता. त्यावेळी तुम्ही हेलन आंटीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. त्यांचा स्वीकार करणं हा मोठा मुद्दा होता. पण त्याचवेळी तुमच्या हातात कोणतंही काम नव्हतं. या सर्व प्रसंगांवर तुम्ही कशी मात केली”, असं अरबाज विचारतो. याचं उत्तर आता प्रेक्षकांना या शोच्या एपिसोडमध्येच ऐकायला मिळेल.

अरबाजच्या या नव्या शोमध्ये जावेद अख्तर, शत्रुघ्न सिन्हा, वहिदा रहमान, हेलन हेसुद्धा पाहुणे म्हणून हजेरी लावणार आहेत. अरबाजचा हा शो दर शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Follow Us
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...