‘धर्माच्या नावावर फक्त…’, विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, भडलेली उर्फी जावेद म्हणते, ‘असं राजकारण्यांचं धोरण…’

Urfi Javed : '...जेव्हा धर्माच्या नावाखाली गुंड हैदोस घालतात, तेव्हा ते काहीच करत नाहीत', उर्फी जावेद हिने जंतरमंतर येथे तरुणांवर झालेल्या लाठीचार्चवर संताप व्यक्त केला आहे, सध्या उर्फीची पोस्ट सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे.

धर्माच्या नावावर फक्त..., विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, भडलेली उर्फी जावेद म्हणते, असं राजकारण्यांचं धोरण...
Urfi Javed
| Updated on: Jul 22, 2026 | 8:12 AM

Uorfi Javed : दिल्ली येथील जंतरमंतर येथे आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामध्ये अनेक तरुण जखमी देखील झाले आहे. अशात उर्फी जावेद हिने देखील घडणाऱ्या घटनांचा निषेध केला आहे. उर्फी हिने सोशल मीडियावर वास्तव सांगत विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे असं सांगितलं. आहे. मोठ्या लोकांना काय फरक पडतो, त्यांची मुलं परदेशात शिकतात आणि सामान्य लोकांची मुलं हक्कासाठी आंदोलन करतात… असं म्हणत उर्फी हिने राजकारण्यांवर देखील निषाणा साधला आहे… सध्या सर्वत्र उर्फी हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

स्वतःचा व्हिडीओ पोस्ट करत उर्फी म्हणाली, ‘ही जी मंत्र्यांची मुलं आहेत, खासदार आमदार यांची मुलं आहेत, ती सगळी परदेशात शिकतात. लंडन, अमेरिका यांना काहीही फरत पडत नाही. येथील जे मुलं आहेत, ती त्यांच्या हक्कांसाठी लढत आहेत. ते तर सामन्या जनतेची मुलं आहे. मध्यम वर्गीय लोकांची मुलं आहेत. ते त्यांच्या हक्कांसाठी लढत आहेत, तर त्यांच्यावर लाठीचार्च होत आहे. त्यांनी टियर गॅसने घाबरवण्यात येत आहे, कारण, त्यांनी त्यांच्या हक्कांसाठी देखील लढलं नाही पाहिजे..

 

 

पुढे उर्फी म्हणाली, ‘आता मी यांच्यावर रिल पोस्ट केली आहे आणि लोकं मला विचारतील किती पैसे मिळाले आहेत. पण जेव्हा तुम्ही असं बोलता तेव्हा राजकारणीविषयी तेव्हा ब्रँड्स कोणीच तुमच्यासोबत करार करत नाही. यासाठी कोणी पैसे देत नाहीत. मला कोणी पैसे दिले नाही, माझ्यासोबत काम करण्याची कोणाची इच्छा नाही.’

इस घटना पर प्रतिक्रिया देते हुए, उर्फी ने सोशल मीडिया पर हिंसा की निंदा की और अधिकारियों की कार्रवाई पर सवाल उठाए. अपनी बात रखते हुए उन्होंने लिखा, “यह दिल दहला देने वाली बर्बरता है और ऐसे समय में यह उनकी खराब छवि ही दिखाती है. जब गुंडे धर्म के नाम पर गंदगी मचाते हैं, तब वे कुछ नहीं करते.”

घडत असलेल्या घटनेला उर्फी हिने धर्माशी देखील जोडलं आहे. उर्फीने सोशल मीडियावर या हिंसाचाराचा निषेध केला आणि प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “ही अत्यंत वेदनादायक आणि विकृती आहे; अशा वेळी यातून त्यांचीच खराब प्रतिमा दिसून येते. जेव्हा धर्माच्या नावाखाली गुंड हैदोस घालतात, तेव्हा ते काहीच करत नाहीत.” असं देखील उर्फी संतापात म्हणाली आहे.

Follow Us