AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आईने विचारलं, लग्न झाल्यावर बायकोचा धर्म बदलशील? वाचा नसीरुद्दीन शाह काय म्हणाले….

बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah ) आणि रत्ना पाठक (Ratna Pathak) बरीच वर्षे एकत्र गुण्यागोविंदाने नांदत आहेत. प्रदीर्घ संबंधानंतर दोघांनी 1982 साली लग्न केले होते.

आईने विचारलं, लग्न झाल्यावर बायकोचा धर्म बदलशील? वाचा नसीरुद्दीन शाह काय म्हणाले....
रत्ना, नसीरुद्दीन शाह
| Edited By: | Updated on: May 23, 2021 | 9:02 AM
Share

मुंबई : बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) आणि रत्ना पाठक (Ratna Pathak) बरीच वर्षे एकत्र गुण्यागोविंदाने नांदत आहेत. प्रदीर्घ संबंधानंतर दोघांनी 1982 साली लग्न केले होते. दोघेही वेगवेगळ्या धर्मांचे होते. तरीसुद्धा त्याच्या प्रेमाच्या दरम्यान धर्माची भिंत कधीच आडवी आली नाही. परंतु, लग्नाआधी नसीरुद्दीनच्या आईने त्यांना विचारले होते की, लग्नानंतर रत्ना धर्म बदलणार का? यावर अभिनेत्याने दिलेले उत्तर कौतुकास्पद होते (When Naseeruddin Shah mother ask him to change wife Ratna Pathak religion after marriage).

नसीरुद्दीन आणि रत्ना यांची पहिली भेट सत्यदेव दुबे यांच्या ‘संभोग से सन्यास तक’ या नाटका दरम्यान झाली होती. या नाटकाच्या तालीमदरम्यान दोघांची एकमेकांशी मैत्री झाली. एका मुलाखती दरम्यान रत्ना पाठक यांनी स्वत: या भेटीविषयी सांगितले होते. त्या म्हणाल्या होत्या की, ‘सत्यदेव दुबे यांनी आमची ओळख करून दिली होती आणि त्यावेळी आमच्या मनात एकमेकांविषयी काहीही नव्हते. मला तर त्याचे नावसुद्धा नीट माहित नव्हते. पहिल्या दिवशी फक्त एक भेट झाली होती. मात्र, दुसर्‍याच दिवशी आम्ही छान मित्र झालो आणि मग एकत्र फिरण्यास सुरवात केली.’

आईला दिलं उत्तर!

जेव्हा नसीरुद्दीन रत्न पाठक शाहशी लग्न करणार होते, तेव्हा त्यांच्या आईने त्यांना विचारले की, तू तुझ्या भावी पत्नीचा धर्म बदलशील का? त्यानंतर नसीरुद्दीनने त्यांना थेट नकारार्थी उत्तर दिले. नसीरुद्दीन शाह म्हणाले होते की, त्यांची आई शिक्षित नसली तरीसुद्धा ती नेहमीच धर्म बदलण्याच्या विरोधात होती. ते म्हणाले की, ‘माझी आई रूढीवादी कुटुंबातील होती, तिचे शिक्षण झाले नव्हते, ती दिवसाला 5 वेळा नमाज अर्पण करायची आणि ती आयुष्यभर उपवास करत राहिली. ती म्हणायची, आपल्या बालपणात ज्या गोष्टी एखाद्याला शिकविण्यात आल्या त्या कशा बदलू शकतात? एखाद्याचा धर्म बदलणे योग्य नाही.’(When Naseeruddin Shah mother ask him to change wife Ratna Pathak religion after marriage)

नसीरुद्दीन शाह म्हणाले की, ‘आम्ही आमच्या मुलांना प्रत्येक धर्माबद्दल सांगितले आहे. परंतु, त्यांचा धर्म काय आहे, हे आम्ही कधीही सांगितले नाही. मला वाटते की धर्माबद्दलचा फरक आणि ही दरी लवकरच सुधारली जाईल. मला असं वाटतं की, माझे लग्न एका हिंदू स्त्रीशी झाले, ही सर्वांसाठी उत्तम उदाहरण आहे.’

नसीरुद्दीन शाह यांच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर, ते शेवटी ‘रक्सम’ या ‘झी 5’च्या चित्रपटात दिसले होते. याशिवाय ते ‘बंदिश बॅन्डिट्स’ या वेब शोमध्ये देखील दिसले होते.

(When Naseeruddin Shah mother ask him to change wife Ratna Pathak religion after marriage)

हेही वाचा :

प्रत्येक डॉक्टर देव नसतो… वडिलांच्या मृत्यूला रुग्णालयच जबाबदार; अभिनेत्री संभावना सेठ लालबूंद

PHOTO | वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी ‘आजी’ बनली हृतिक रोशनची ‘ही’ अभिनेत्री, नातीचे फोटो केले सोशल मीडियावर शेअर!

Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.