AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: शांत रहाणं म्हणजे अन्याय करणाऱ्याला साथ देणं, नसीरुद्दीन शाह यांची मोदी सरकारवर टीका

अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी शेतकरी आंदोलनावर शांत राहून कोणतीही भूमिका न घेणाऱ्या बॉलिवूडच्या दिग्गजांना चांगलंच सुनावलं आहे.

VIDEO: शांत रहाणं म्हणजे अन्याय करणाऱ्याला साथ देणं, नसीरुद्दीन शाह यांची मोदी सरकारवर टीका
| Updated on: Feb 08, 2021 | 5:47 PM
Share

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. यावेळी देखील त्यांनी शेतकरी आंदोलनावर आपली रोखठोक भूमिका व्यक्त केली आहे. तसेच शेतकरी आंदोलनावर शांत राहून कोणतीही भूमिका न घेणाऱ्या बॉलिवूडच्या दिग्गजांना त्यांनी चांगलंच सुनावलं आहे. “शांत रहाणं म्हणजे अन्याय करणाऱ्याला साथ देणं आहे. बॉलिवूडमधील अनेकांना शेतकऱ्यांना पाठिंबा दिल्यास आपलं खूप मोठं नुकसान होईल, अशी भीती वाटतेय, पण त्यांनी आधीच आपल्या 7 पीढ्या बसून खातील इतकं कमावलं आहे. त्यामुळे त्यांनी भूमिका घ्यावी,” असं मत व्यक्त केलंय. त्यांनी एक व्हिडीओ ट्विट करत यात आपलं म्हणणं माडंलं आहे (Naseeruddin Shah support Farmer Protest criticize Bollywood for not supporting).

नसीरुद्दीन शाह म्हणाले, “हजारो शेतकरी भाऊ बहिणी, वयोवृद्ध शेतकरी, लहान मुलं दिल्लीच्या गोठवणाऱ्या थंडीत या सरकारकडे आपला हक्का मागत आहेत. शेतकरी मोठ्या संख्येने एकत्रित येऊन न्याय मागत आहेत. या सर्वांना माझा सलाम. या देशाचे सत्ताधारी शेतकऱ्यांसोबत बिघडलेल्या आई-बापासारखं वर्तन करत आहेत. हे आई-बाप आपल्या मुलाने काही मागणी केल्यास तुला काहीच माहिती नाही असं उत्तर देतात. तुझ्यासाठी काय चांगलं आहे हे तुझ्यापेक्षा आम्हाला जास्त कळतं, असंही ते सांगतात.”

“मला वाटतं जो शेतकरी आपल्या हातांनी जमिनीत नांगरणी करतो, तो मोठ्या कष्टाने आणि प्रेमाने बियाणं पेरतो. हा शेतकरी या जमिनीची मशागत करतो आणि त्यात आपल्या मुलाप्रमाणे त्या पिकाची काळजी घेतो, त्याचं पालनपोषण करुन वाढवतो. त्या शेतकऱ्याला काय हवं हे त्याच्यापेक्षा जास्त कुणालाच चांगलं माहिती नाही,” असंही त्यांनी नमूद केलं.

‘सरकार काहीही म्हणो, लाखो लोकांचे आशीर्वाद शेतकऱ्यांसोबत’

नसीरुद्दीन शाह म्हणाले, “हे सरकार हजारवेळा तुम्हाला काही कळत नाही सांगेल, गद्दार, देशद्रोही म्हणेल, पण माझ्यासारखे लाखो लोक आहेत ज्यांचे आशीर्वाद शेतकऱ्यांसोबत आहेत. आमच्यासाठी तुम्ही संयम, हिंमत आणि शक्तीचं उदाहरण आहे. तुमच्यासाठी अल्लामा अकबर या शायरने म्हटलं होतं की “आप है नाझीमें गुल, पास बाने रंग बू, गुलशन पनाह, नाझ परवर, लेहलेहाते खेतों का बादशाह, हमारे अन्नदाता, हमारे परवर हमारे सरफरस्त”. तुम्हाला तुमचं ध्येय जरुन मिळो.”

‘बॉलिवूडमधील दिग्गजांनी 7 पीढ्या बसून खातील इतकं कमावलंय, आता शेतकऱ्यांसाठी बोलावं’

“मला वाटतं हे शेतकऱ्यांचं आंदोलन नक्की वाढेल आणि त्यात सर्वसामान्य लोकही सहभागी होतील. शांत राहणं हे अन्याय करणाऱ्याला साथ देणं आहे. चित्रपटसृष्टीचे मोठमोठे दिग्गज लोक शांत बसलेत. त्यांना भीती आहे की शेतकऱ्यांना पाठिंबा दिल्यास त्यांना मोठं नुकसान होईल. तुम्ही इतकी संपत्ती कमावली आहे की तुमच्या सात पिढ्या बसून खाऊ शकतील,” असंही मत नसीरुद्दीन शाह यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा :

मला माझ्या मुलांची चिंता वाटते : नसीरुद्दीन शाह

भाजप आणि मित्रपक्षांना मतदान करु नका, 600 कलाकारांचं पत्र लिहून आवाहन

व्हिडीओ पाहा :

Naseeruddin Shah support Farmer Protest criticize Bollywood for not supporting

Follow Us
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.