AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anant-Radhika Pre-Wedding | प्रचंड पैसा, पण अनंत यांनी प्री वेडिंगसाठी जामनगरचीच निवड का केली?

Anant-Radhika Pre-Wedding | मुकेश अंबानी यांच्याकडे प्रचंड पैसा आहे. ते आपल्या धाकट्या मुलाच लग्न परदेशात करु शकले असते, पण त्यांनी गुजरातच्या जामनगरचीच निवड का केली? त्यामागे काय कारण आहेत?

Anant-Radhika Pre-Wedding | प्रचंड पैसा, पण अनंत यांनी प्री वेडिंगसाठी जामनगरचीच निवड का केली?
Anant-Radhika Pre-WeddingImage Credit source: getty
| Updated on: Feb 29, 2024 | 9:57 AM
Share

Anant-Radhika Pre-Wedding | प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या घरात पुन्हा एकदा अक्षता डोक्यावर पडणार आहेत. अनंत-राधिकाच्या लग्नाची तारीख निश्चित झालीय. दोघे 12 जुलैला मुंबईत लग्न करणार आहेत. त्याआधी अंबानी कुटुंबाने अनंत-राधिकाच भव्य प्री-वेडिंग आयोजित केलं आहे. प्री-वेडिंगच ग्रँड फंक्शन 1 ते 3 मार्च दरम्यान गुजरातच्या जामनगरमध्ये होणार आहे. लग्नाआधीच्या या सेलिब्रेशनमध्ये बॉलिवूड स्टार्सपासून राजकीय क्षेत्रातील बडे नेते, बिझनेसमॅन आणि आंतरराष्ट्रीय पाहुणे सहभागी होणार आहेत.

मुकेश अंबानी यांच्याकडे प्रचंड पैसा आहे. ते आपल्या धाकट्या मुलाच लग्न परदेशात करु शकले असते, पण त्यांनी गुजरातच्या जामनगरचीच निवड का केली? त्यामागे काय कारण आहे? जाणून घ्या. अनंत अंबानी यांनी सांगितलं की, अलीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वेड इन इंडिया’च अपील केलं होतं. अनंत अंबानी यांना पंतप्रधान मोदींच हे आवाहन खूप भावलं. त्यामुळे त्यांनी देशातच लग्न करण्याचा निर्णय घेतला. प्री वेडिंग फंक्शन जामनगरमध्ये आयोजित करण्यामागच हे एक कारण आहे.

जामनगरबद्दल विशेष आपुलकी का?

अनंत अंबानी यांनी सांगितलं की, “त्यांच्या आजीचा जन्म जामनगरमध्ये झाला. त्यांचे आजोबा धीरुभाई अंबानी आणि मुकेश अंबानी यांनी उद्योगाची सुरुवात जामनगरमधून केली. त्यामुळे जामनगरबद्दल त्यांना विशेष आपुलकी आहे” ‘जामनगरमध्येच मी लहानाचा मोठा झालो’, असं अनंत अंबानी यांनी सांगितलं.

‘वेड इन इंडिया’च अपील

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्यावर्षी डेस्टिनेशन वेडिंगसाठी परदेशाची निवड करणाऱ्या जोडप्यांना भारतातच लग्न करण्याच अपील केलं होतं. पीएम मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात हे वक्तव्य केलं होतं. पीएम मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर ‘वेड इन इंडिया’च आवाहन केलं होतं.

Follow Us
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच...
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच मोठी खळबळ; महापालिकेत काय घडलं?
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड संताप; नाव न घेता राऊतांना थेट इशारा?
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने  खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ
मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!