AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

21 दिवस गव्हाची चपाती न खाल्ल्यास शरीरात काय होतात बदल? जाणून हैराण व्हाल

21 दिवस गव्हाची चपाती जर आपण खाणे सोडले तर आपल्या शरीरात अनेक बदल होतात असं म्हटलं जातं. पण नक्की काय? आणि जर गव्हाची चपाती,रोटी खायची नसेल तर त्याला पर्याय काय असू शकतो हेही जाणून घेऊयात.

21 दिवस गव्हाची चपाती न खाल्ल्यास शरीरात काय होतात बदल? जाणून हैराण व्हाल
21 Days No Wheat Chapati, Body Transformation & Health BenefitsImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 30, 2025 | 7:17 PM
Share

भारतातील जवळजवळ प्रत्येक घरात गव्हाची चपाती बनवली जाते. लोक वर्षानुवर्षे गव्हाची चपाती किंवा रोटी खात आहेत . मैदा खाण्यापेक्षा गव्हाची चपाती कधीही चांगली अशी धारणा आहे. त्यामुळे घरात चपातीही असतेच असते. पण तुम्हाला माहिती आहे का की ते आपल्या शरीरासाठी गव्हाची चपाती कितपत फायदेशीर असते? आपण कधी याचा विचार केला का?

21 दिवस गव्हाची चपाती खाणे सोडून दिले तर…

गहू पौष्टिक गुणधर्मांनी परिपूर्ण असतो परंतु हे देखील खरे आहे की ते खाल्ल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढते. गव्हाची चपाती लवकर पचत नाही, ज्यामुळे ती पचनक्रिया बिघडू शकते. जर कोणी 21 दिवस गव्हाची चपाती खाणे सोडून दिले तर शरीरात काय बदल होतील? तज्ज्ञांनी काय म्हटलं आहे जाणून घेऊयात.

गव्हाची चपाती का खाऊ नये?

तज्ज्ञांच्या मते आपल्याला आपल्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करायचे असेल तर सर्वप्रथम आपला आहार बदलावा लागेल. आहारात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे धान्य. यामध्ये सर्वात हानिकारक धान्य म्हणजे गहू. जर आपण फक्त 21 दिवस जरी गहू म्हणजे चपाती, रोटी खाणं सोडलं तर नक्कीच संपूर्ण शरीरात बदल दिसून येतील.

गव्हाचे तोटे काय असतात?

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की गहू खाल्ल्याने लोकांना जळजळ होते. जळजळ म्हणजे शरीरात सूज येणे. अनेक लोकांना हे देखील माहित नसते की त्यांना गव्हाची ऍलर्जी आहे, त्यामुळे त्यांना नंतर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. गव्हामध्ये ग्लूटेन असते. अशा परिस्थितीत, या लोकांना पोटात, चेहऱ्यावर आणि नंतर हातपायांवर सूज येते. अनेकांना तर गॅसची समस्याही जाणवू लागते कारण गहू पचायला जड असतो. त्यामुळे काहींना दिवसभर थकवाही जाणवू शकतो.

गव्हाच्या चपाती किंवा रोटीऐवजी काय खावं?

गव्हाऐवजी तुम्ही भरड धान्याच्या पोळ्या खाऊ शकता. तुम्ही नाचणी किंवा बाजरी खाऊ शकता. हे खाल्ल्याने तुम्हाला दिसेल की तुमचा फिटनेस खूप सुधारला आहे. यासोबतच, शरीराला भरड धान्यापासून अनेक प्रकारचे पोषक घटक मिळतात. शिवाय चपातीप्रमाणे पोट जड होत नाही. पोट हलक भासतं. उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात बाजरीच्या भाकरी खाणे चांगले असते. तसेच नाचणीमध्ये देखील बरीच जीवनसत्त्वे असतात.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.