AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Energy Booster: दिवसभर फ्रेश, एनर्जेटिक राहाण्यासाठी ‘या’ ड्रिक्सचे सेवन करा

Energy Booster Drinks: निरोगी आरोग्यासाठी तुमच्या आरोग्यामध्ये पोषक तत्वांचा समावेश करणे गरजेचे असते. तुमच्या खाण्या पिण्याच्या सवयींमध्ये पोषक तत्वांचा समावेश केल्यामुले तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदे होतात. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काही विशेष पेयांचे समावेश करणे गरजेचे आहे.

Energy Booster: दिवसभर फ्रेश, एनर्जेटिक राहाण्यासाठी 'या' ड्रिक्सचे सेवन करा
drinksImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Feb 24, 2025 | 1:37 PM
Share

आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना त्यांच्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेता येत नाही. लोकं त्यांच्या खाण्या पिण्याच्या सवयींबद्दल निष्काळजी राहू लागले आहेत. व्यस्त जीवनशैलीमुळे जंक फूडच्या सेवनाचे प्रमाण वाढले आहे. जंक फूडचे जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे तुम्हाला आरोग्यासंबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जंक फूडमध्ये पोषक तत्वांची कमी असते ज्यामुळे तुमच्या शरीराला योग्य पोषण मिळत नाही आणि दिवसभराच्या धावपळीमुळे आणि तणावामुळे तुमच्या शरीरातील उर्जा कमी होण्यास मदत होते. तुमच्या शरीरातील उर्जा कमी झाल्यामुळे अशक्तपणाच्या समस्या उद्भवतात आणि चक्कर सारख्या समस्या उद्भवतात.

ज्या दिवशी तुम्हाला अशक्तपणा जाणवतो त्याचा अर्थ तुमच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे काहीतरी चुकत आहे आणि तुमच्या आरोग्याला योग्य पोषण मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमच्या आहोराची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे. तुमच्या आहारामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटिन, फायबर, मॅग्नेशियम आणि हेल्दी फॅट्स असतात ज्यामुळे तुमच्या आरोग्याला योग्य पोषण मिळण्यास मदत होते. तुमच्या शरीरत उर्जा टिकवून ठेवण्यासाठी या पदार्थांचे सेवन करणे फायदेशीर ठरेल. तुमच्या आहारामध्ये काही विशेष पेयांचे सेवन केल्यामुळे तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.

नारळ पाणी – नारळ पाणीमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम, कॅल्शियम, मॅगनीज, अँटिऑक्सिडंट्स आणि अमीनो अॅसिड असतात ज्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. नारळ पाण्याचे सेवन केल्यामुळे तुमच्या शरीराला योग्य प्रमाणात पोषक तत्वं मिळतात ज्यामुळे तुमच्या शरीराला योग्य प्रमाणात उर्जा मिळण्यास मदत होते. नारळ पाण्याचे नियमित सेवन केल्यामुळे गर्मीत होणाऱ्या डिहाड्रेशन पासून तुम्हाला आराम मिळतो.

आवळा बीट आणि गाजर ज्यूस – आवळा बीट आणि गाजरचा ज्यूस प्यायल्यामुळे तुमच्या शरीराला उर्जा मिळण्यास मदत होते. गाजरमधील जीवनसत्त्वे, फायबर आणि प्रथिने शरीराला पोषण देण्यास मदत करतात. बीटमध्ये नैसर्गिक रसायनिक नायट्रेटचा चांगला स्त्रोत आहे ज्यामुळे तुमच्या संपूर्ण शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते. या रसाच्या सेवनामुळे तुमच्या शरीरातील रक्तदाब नियंत्रित राहाण्यास मदत होते. आवळा तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत करते.

ड्रायफ्रुट शेक – ड्रायफ्रूट शेकमध्ये असलेले कार्बोहायड्रेट्स आणि नैसर्गिक साखर तुमच्या शरीराला पुरेशी ऊर्जा मिळण्यास मदत होते. याशिवाय, तुम्हाला जर बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचन यासारख्या समस्या असतील तर त्या दूर होण्यास मदत होते. ड्रायफ्रूट्समधील व्हिटॅमिन बी तुमच्या स्नायूंना उर्जा मिळण्यास मदत होते.

मिक्स फळांचा ज्यूस – मिक्स फळांमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, फॉलिक अॅसिड आणि फायबर तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. मिक्स फळांचा ज्यूस प्यायल्यामुळे तुमच्या शरीरातील उर्जा टिकवून ठेवण्यास मदत होते. मिक्स फळांचे सेवन तुमच्या आरोग्यासह त्वचेसाठी देखील फायदेशीर ठरतो.

ओट्स स्मूथी – ओट्स तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. ओट्सचे स्मूथी प्यायल्यामुळे तुमच्या शरीरातील वजन नियंत्रित ठेवण्यास आणि शरीराला उर्जा देण्यास मदत होते. ओट्सचे सेवन केल्यामुले तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.