AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भरपूर झोपल्यानंतरही दिवसभर येतोय आळस ? तुम्हाला हा आजार तर नाही ?

रात्रीचं जागरण झाले तर दिवस आळसावल्यासारखा जाणे हे सामान्य आहे. परंतू रात्रभर नीट झोपून झाले तरी दिवसभर आळसात जाणे. हे एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते.

भरपूर झोपल्यानंतरही दिवसभर येतोय आळस ? तुम्हाला हा आजार तर नाही ?
| Updated on: Jun 27, 2025 | 9:18 PM
Share

रात्रीचे चांगलं झोपूनही दिवस आळसात जात असल्याची अनेकांची तक्रार असते. मग कामाच्या ठिकाणी डुलक्या काढाव्या लागतात. शरीराला थकवा जाणवतो. कोणत्याही कामात लक्ष लागत नाही. सारखी डोळ्यावर झापड येतेय तर याकडे दुर्लक्ष करु नका. ही लक्षणं एका गंभीर समस्येचा संकेत असू शकतात. अखेर का असे होते. आणि यापासून सुटका कशी करायची ते जाणून घेऊयात..

हायपर सोम्नियाचा तर त्रास नाही ना

रात्रीच्या जागरणानंतर दिवसा झोप येणे ही सामान्य बाब आहे. परंतू रात्री नीट झोपल्यानंतर जर दिवसा सारखा आळस येत असले तर ही बाब काही सामान्य म्हटली जात नाही. याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरु शकते. हा प्रकार हायपरसोम्नियाने ( Hypersomnia ) देखील होऊ शकतो. या स्थितीत व्यक्तीला प्रमाणाच्या बाहेर झोप येते. या हायपर सोम्नियाचे कारण काही वाईट सवयी आणि रोग असू शकतात.

ही असू शकतात कारणे

मद्य :

जास्त मद्यपान केल्याने झोपेवर परिणाम होतो. त्यामुळे दिवसभर झोप येऊ शकतात.

मसल्स कमजोर :

जर बॉडीमध्ये मसल्स कमजोर असतील तर वारंवार झोप येऊ शकते.

रात्रीची नीट झोप न येणे:

अनेकांना रात्रीची झोप येत नाही. त्यामुळे रात्री बिछान्यात तळमळत पडावे लागते. याने हायपरसोम्नियाचा धोका आणखी वाढतो.

औषधाचे साईड इफेक्ट :

अनेकदा औषधांच्या साईड इफेक्टमुळे हायपरसोम्नियाचा त्रास होऊ शकतो. यामुळे दिवसा झोप अधिक येते.

मधुमेह :

डायबिटीज झाल्यानंतर शरीरात साखरेचे प्रमाण वाढले तर हायपरसोम्नियाचा त्रास वाढू शकतो.डायबिटीजमध्ये शरीर ग्लुकोजला ऊर्जेत बदलण्यात असमर्थ असते. यामुळेही दिवसाचा थकवा आणि झोप येते.वारंवार तहान लागणे आणि लघवीला येणे, वजन कमी होणे याची लक्षणे आहेत.

थायरॉईड:

हायपोथायरायडिज्ममध्ये थायरॉईड ग्रंथी प्रभावित होतात. त्याचा प्रभाव मेटोबॉलिज्मवर पडतो. यामुळे सुस्ती , थकवा आणि वारंवार झोप येण्याची समस्या वाढते. वजन वाढणे, थंडी वाजणे आणि केस गळणे याचे लक्षण आहे.

एनीमिया:

एनिमियात हिमोग्लोबिन कमी असल्याने शरीरात ऑक्सीजनचा पुरवठा कमी होतो. त्यामुळे थकवा आणि झोपेची समस्या वाढू शकते. हे आर्यन, विटामिन्स बी-12 वा फोलिक एसिडच्या कमतरतेने होऊ शकते.

स्लीप एपनिया:

स्लीप एपनिया एक अशी स्थिती आहे यात गाढ झोपेत असताना श्वास वारंवार थांबतो. त्यामुळे गाढ आणि सुखाची झोप येत नाही.या कारणाने दिवसाची झोप येते. थकवा, डोकेदुखी आणि एकाग्रतेची कमी सारखी लक्षणे दिसतात.

काय आहेत लक्षणे ?

एंग्जायटी आणि स्ट्रेस

चिडचिडेपणा

दिवसभर चिडचिडपणा

शरीर थकलले वाटणे

सर्व गोष्टींवर राग येणे

सकाळी झोपेतून उठूच नये असे वाटणे

डोकेदुखी

भूख न लागणे

वारंवार एखादी गोष्ट विसरणे

बेचैन झाल्यासारखे वाटणे

एकाग्रता करताना अडचण येणे

Follow Us
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चे सुरुच1.
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी
नेपाळमध्ये महापूर; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महापुरात एक हजारहून अधिक बेपत्ता; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला विरोध!
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा तीव्र विरोध
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न
प्रसाद लाड पुन्हा मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधणार