AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भरपूर झोपल्यानंतरही दिवसभर येतोय आळस ? तुम्हाला हा आजार तर नाही ?

रात्रीचं जागरण झाले तर दिवस आळसावल्यासारखा जाणे हे सामान्य आहे. परंतू रात्रभर नीट झोपून झाले तरी दिवसभर आळसात जाणे. हे एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते.

भरपूर झोपल्यानंतरही दिवसभर येतोय आळस ? तुम्हाला हा आजार तर नाही ?
| Updated on: Jun 27, 2025 | 9:18 PM
Share

रात्रीचे चांगलं झोपूनही दिवस आळसात जात असल्याची अनेकांची तक्रार असते. मग कामाच्या ठिकाणी डुलक्या काढाव्या लागतात. शरीराला थकवा जाणवतो. कोणत्याही कामात लक्ष लागत नाही. सारखी डोळ्यावर झापड येतेय तर याकडे दुर्लक्ष करु नका. ही लक्षणं एका गंभीर समस्येचा संकेत असू शकतात. अखेर का असे होते. आणि यापासून सुटका कशी करायची ते जाणून घेऊयात..

हायपर सोम्नियाचा तर त्रास नाही ना

रात्रीच्या जागरणानंतर दिवसा झोप येणे ही सामान्य बाब आहे. परंतू रात्री नीट झोपल्यानंतर जर दिवसा सारखा आळस येत असले तर ही बाब काही सामान्य म्हटली जात नाही. याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरु शकते. हा प्रकार हायपरसोम्नियाने ( Hypersomnia ) देखील होऊ शकतो. या स्थितीत व्यक्तीला प्रमाणाच्या बाहेर झोप येते. या हायपर सोम्नियाचे कारण काही वाईट सवयी आणि रोग असू शकतात.

ही असू शकतात कारणे

मद्य :

जास्त मद्यपान केल्याने झोपेवर परिणाम होतो. त्यामुळे दिवसभर झोप येऊ शकतात.

मसल्स कमजोर :

जर बॉडीमध्ये मसल्स कमजोर असतील तर वारंवार झोप येऊ शकते.

रात्रीची नीट झोप न येणे:

अनेकांना रात्रीची झोप येत नाही. त्यामुळे रात्री बिछान्यात तळमळत पडावे लागते. याने हायपरसोम्नियाचा धोका आणखी वाढतो.

औषधाचे साईड इफेक्ट :

अनेकदा औषधांच्या साईड इफेक्टमुळे हायपरसोम्नियाचा त्रास होऊ शकतो. यामुळे दिवसा झोप अधिक येते.

मधुमेह :

डायबिटीज झाल्यानंतर शरीरात साखरेचे प्रमाण वाढले तर हायपरसोम्नियाचा त्रास वाढू शकतो.डायबिटीजमध्ये शरीर ग्लुकोजला ऊर्जेत बदलण्यात असमर्थ असते. यामुळेही दिवसाचा थकवा आणि झोप येते.वारंवार तहान लागणे आणि लघवीला येणे, वजन कमी होणे याची लक्षणे आहेत.

थायरॉईड:

हायपोथायरायडिज्ममध्ये थायरॉईड ग्रंथी प्रभावित होतात. त्याचा प्रभाव मेटोबॉलिज्मवर पडतो. यामुळे सुस्ती , थकवा आणि वारंवार झोप येण्याची समस्या वाढते. वजन वाढणे, थंडी वाजणे आणि केस गळणे याचे लक्षण आहे.

एनीमिया:

एनिमियात हिमोग्लोबिन कमी असल्याने शरीरात ऑक्सीजनचा पुरवठा कमी होतो. त्यामुळे थकवा आणि झोपेची समस्या वाढू शकते. हे आर्यन, विटामिन्स बी-12 वा फोलिक एसिडच्या कमतरतेने होऊ शकते.

स्लीप एपनिया:

स्लीप एपनिया एक अशी स्थिती आहे यात गाढ झोपेत असताना श्वास वारंवार थांबतो. त्यामुळे गाढ आणि सुखाची झोप येत नाही.या कारणाने दिवसाची झोप येते. थकवा, डोकेदुखी आणि एकाग्रतेची कमी सारखी लक्षणे दिसतात.

काय आहेत लक्षणे ?

एंग्जायटी आणि स्ट्रेस

चिडचिडेपणा

दिवसभर चिडचिडपणा

शरीर थकलले वाटणे

सर्व गोष्टींवर राग येणे

सकाळी झोपेतून उठूच नये असे वाटणे

डोकेदुखी

भूख न लागणे

वारंवार एखादी गोष्ट विसरणे

बेचैन झाल्यासारखे वाटणे

एकाग्रता करताना अडचण येणे

Follow Us
खरातचे अनेक नेत्यांसोबत फोटो, पण आपल्याच पक्षातील...जय पवारांनी व्यक्त
खरातचे अनेक नेत्यांसोबत फोटो, पण आपल्याच पक्षातील...जय पवारांनी व्यक्त.
माजी आमदारांची महिलांबाबत बोलताना जीभ घसरली, माफी मागण्यासही दिला नका
माजी आमदारांची महिलांबाबत बोलताना जीभ घसरली, माफी मागण्यासही दिला नका.
एपस्टिन फाईल्सबाबत मोठी अपडेट समोर, तब्बल 600 कोटी... 75 पीडितांसाठी थ
एपस्टिन फाईल्सबाबत मोठी अपडेट समोर, तब्बल 600 कोटी... 75 पीडितांसाठी थ.
खरातसारखी प्रकरणं हँडल करण्यात देवेंद्रजी मास्टर- चंद्रकांत पाटील
खरातसारखी प्रकरणं हँडल करण्यात देवेंद्रजी मास्टर- चंद्रकांत पाटील.
अशोक खरात प्रकरण... अंजली दमानियांनी उघड केलेला कॉल डेटा खरा की Fake?
अशोक खरात प्रकरण... अंजली दमानियांनी उघड केलेला कॉल डेटा खरा की Fake?.
एका विशिष्ट तारखेला खरातने अनेक पतसंस्थेत खाते उघडले?
एका विशिष्ट तारखेला खरातने अनेक पतसंस्थेत खाते उघडले?.
लातूरमध्ये शेतीला अवकाळीचा मोठा फटका, पावसामुळे हाताशी आलेलं पिक...
लातूरमध्ये शेतीला अवकाळीचा मोठा फटका, पावसामुळे हाताशी आलेलं पिक....
रामनवमी सभेत टी. राजा सिंह यांची वादग्रस्त विधानं; औरंगजेबची कबर.....
रामनवमी सभेत टी. राजा सिंह यांची वादग्रस्त विधानं; औरंगजेबची कबर......
बारामतीत सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार? ठाकरे गटात 2 मतप्रवाह- सुत्र
बारामतीत सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार? ठाकरे गटात 2 मतप्रवाह- सुत्र.
उदय सामंत यांनी घेतली शरद पवारांची भेट; महाराष्ट्र एक राजकीय संस्कार..
उदय सामंत यांनी घेतली शरद पवारांची भेट; महाराष्ट्र एक राजकीय संस्कार...