AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डायबिटीज रुग्णांसाठी फळ आणि फळांचा रस यापैकी काय आहे जास्त फायदेशीर? जाणून घ्या

डायबिटीज असणाऱ्यांसाठी फळांचा संपूर्ण आणि नैसर्गिक स्वरूपात (साल व गूदा सहित) समावेश अधिक फायदेशीर ठरतो. फळांचा रस ही एक गोड वाटणारी, पण आरोग्यास धोका ठरू शकणारी निवड असू शकते. त्यामुळे तुम्ही डायबिटिक असाल, तर रोजच्या आहारात काय समाविष्ट करावं आणि काय टाळावं, हे एकदा नक्की वाचा...

डायबिटीज रुग्णांसाठी फळ आणि फळांचा रस यापैकी काय आहे जास्त फायदेशीर? जाणून घ्या
मधुमेहला हरवाImage Credit source: गुगल
साक्षी कणसे
साक्षी कणसे | Edited By: | Updated on: Jun 18, 2025 | 2:28 PM
Share

डायबिटीज म्हणजेच मधुमेह असणाऱ्यांनी आपल्या आहारात कोणते अन्नपदार्थ घेणे योग्य आहे आणि कोणते टाळावेत, याचे भान ठेवणे फार गरजेचे असते. कारण चुकीची आहाराची निवड केवळ आरोग्यावरच नव्हे तर थेट रक्तातील साखरेच्या पातळीवरही परिणाम करू शकते. याच पार्श्वभूमीवर सध्या एक मोठा प्रश्न समोर येतो तो म्हणजे फळ खाणं अधिक योग्य की फळांचा रस पिणं?

साधारणतः फळे ही आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त मानली जातात कारण त्यामध्ये नैसर्गिक साखर म्हणजेच फ्रुक्टोज, फायबर, विविध प्रकारची जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. फायबरमुळे पचनक्रिया संथ होते, ज्यामुळे साखर शरीरात हळूहळू शोषली जाते. त्यामुळे ब्लड शुगर झपाट्याने वाढत नाही. तसेच फळे खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते, जे ओव्हरईटिंगपासून रोखते.

मग फळांचा रस का नाही योग्य?

फळांचा रस काढताना त्यातील फायबरचा भाग म्हणजे गूदा आणि साल वेगळे केले जाते. त्यामुळे त्यात फायबर जवळपास शून्य होतो. अशा रसायनशून्य रसामध्ये साखरेची मात्रा खूप जास्त असते आणि ती शरीरात झपाट्याने शोषली जाते, जे ब्लड शुगर वाढवते. शिवाय, एक गिलास रस बनवण्यासाठी २-३ फळांचा वापर केला जातो, त्यामुळे त्यातील कॅलरी इन्टेक जास्त होतो. ही सर्व कारणं मिळून डायबिटीज असणाऱ्या व्यक्तींसाठी रस हे चांगले पर्याय ठरत नाहीत.

योग्य फळांची निवड महत्त्वाची

सर्व फळे डायबिटिक व्यक्तींना फायदेशीर असतीलच असे नाही. ग्लायसेमिक इंडेक्स (GI) यावर आधारित फळांची निवड केली पाहिजे. कमी GI असलेली फळे म्हणजे, सफरचंद, नाशपती, संत्री, जामुन, कीवी, अमरूद ही फळे हळूहळू साखर रक्तात मिसळतात आणि त्यामुळे शुगर नियंत्रणात राहते.

तर दुसरीकडे, आंबा, केळी, चीकू, द्राक्षे यांसारख्या फळांचा GI जास्त असल्यामुळे ती रक्तातील साखर लवकर वाढवू शकतात. म्हणूनच अशा फळांचे प्रमाण नियंत्रित ठेवावे.

साबुत फळ खाणे ही रसाच्या तुलनेत चांगली सवय असली तरी त्याचेही प्रमाण ठरवूनच घेतले पाहिजे. खूप जास्त फळे एकत्र खाल्ल्यास त्यातून मिळणारी साखर एकदम वाढू शकते. त्यामुळे आहारात फळे समाविष्ट करताना पोषणतज्ज्ञांचा सल्ला घेणे उत्तम ठरेल.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा