AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डायबिटीज रुग्णांसाठी फळ आणि फळांचा रस यापैकी काय आहे जास्त फायदेशीर? जाणून घ्या

डायबिटीज असणाऱ्यांसाठी फळांचा संपूर्ण आणि नैसर्गिक स्वरूपात (साल व गूदा सहित) समावेश अधिक फायदेशीर ठरतो. फळांचा रस ही एक गोड वाटणारी, पण आरोग्यास धोका ठरू शकणारी निवड असू शकते. त्यामुळे तुम्ही डायबिटिक असाल, तर रोजच्या आहारात काय समाविष्ट करावं आणि काय टाळावं, हे एकदा नक्की वाचा...

डायबिटीज रुग्णांसाठी फळ आणि फळांचा रस यापैकी काय आहे जास्त फायदेशीर? जाणून घ्या
मधुमेहला हरवाImage Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: Jun 18, 2025 | 2:28 PM
Share

डायबिटीज म्हणजेच मधुमेह असणाऱ्यांनी आपल्या आहारात कोणते अन्नपदार्थ घेणे योग्य आहे आणि कोणते टाळावेत, याचे भान ठेवणे फार गरजेचे असते. कारण चुकीची आहाराची निवड केवळ आरोग्यावरच नव्हे तर थेट रक्तातील साखरेच्या पातळीवरही परिणाम करू शकते. याच पार्श्वभूमीवर सध्या एक मोठा प्रश्न समोर येतो तो म्हणजे फळ खाणं अधिक योग्य की फळांचा रस पिणं?

साधारणतः फळे ही आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त मानली जातात कारण त्यामध्ये नैसर्गिक साखर म्हणजेच फ्रुक्टोज, फायबर, विविध प्रकारची जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. फायबरमुळे पचनक्रिया संथ होते, ज्यामुळे साखर शरीरात हळूहळू शोषली जाते. त्यामुळे ब्लड शुगर झपाट्याने वाढत नाही. तसेच फळे खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते, जे ओव्हरईटिंगपासून रोखते.

मग फळांचा रस का नाही योग्य?

फळांचा रस काढताना त्यातील फायबरचा भाग म्हणजे गूदा आणि साल वेगळे केले जाते. त्यामुळे त्यात फायबर जवळपास शून्य होतो. अशा रसायनशून्य रसामध्ये साखरेची मात्रा खूप जास्त असते आणि ती शरीरात झपाट्याने शोषली जाते, जे ब्लड शुगर वाढवते. शिवाय, एक गिलास रस बनवण्यासाठी २-३ फळांचा वापर केला जातो, त्यामुळे त्यातील कॅलरी इन्टेक जास्त होतो. ही सर्व कारणं मिळून डायबिटीज असणाऱ्या व्यक्तींसाठी रस हे चांगले पर्याय ठरत नाहीत.

योग्य फळांची निवड महत्त्वाची

सर्व फळे डायबिटिक व्यक्तींना फायदेशीर असतीलच असे नाही. ग्लायसेमिक इंडेक्स (GI) यावर आधारित फळांची निवड केली पाहिजे. कमी GI असलेली फळे म्हणजे, सफरचंद, नाशपती, संत्री, जामुन, कीवी, अमरूद ही फळे हळूहळू साखर रक्तात मिसळतात आणि त्यामुळे शुगर नियंत्रणात राहते.

तर दुसरीकडे, आंबा, केळी, चीकू, द्राक्षे यांसारख्या फळांचा GI जास्त असल्यामुळे ती रक्तातील साखर लवकर वाढवू शकतात. म्हणूनच अशा फळांचे प्रमाण नियंत्रित ठेवावे.

साबुत फळ खाणे ही रसाच्या तुलनेत चांगली सवय असली तरी त्याचेही प्रमाण ठरवूनच घेतले पाहिजे. खूप जास्त फळे एकत्र खाल्ल्यास त्यातून मिळणारी साखर एकदम वाढू शकते. त्यामुळे आहारात फळे समाविष्ट करताना पोषणतज्ज्ञांचा सल्ला घेणे उत्तम ठरेल.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क...
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क....
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह...
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह....
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं.
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका.
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च.
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात.
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह.
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र.
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका.
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा.