AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवाळीपासून लुटा आरोग्यदायी हवेचा आनंद, महाराष्ट्रासाठी ‘ही’ आनंदाची बाब!

इथून पुढे राज्यातील किमान तापमानात घट होण्यास सुरुवात होईल. 23 ऑक्टोबर रोजी राज्यात कुठेही पावसाची नोंद नाही, अशी माहिती हवामान विभागाचे तज्ज्ञ के एस होसळीकर यांनी दिली.

दिवाळीपासून लुटा आरोग्यदायी हवेचा आनंद, महाराष्ट्रासाठी 'ही' आनंदाची बाब!
Image Credit source: social media
| Updated on: Oct 24, 2022 | 8:42 AM
Share

मुंबईः दिवाळी (Diwali) आली तरी पावसाळा (Rain) संपत नसल्याचं चित्र पाहून अनेकांना आरोग्याची चिंता सतावत होती. मात्र दिवाळसणानं महाराष्ट्रासाठी (Maharashtra) आनंदाची बातमी आणली आहे. चार ऐवजी पाच महिने मुक्काम ठोकल्यानंतर पावसाचा हंगाम आता संपला आहे. यावेळचा पावसाळा जवळपास 100 दिवस चालला.

20 ऑक्टोबरपासूनच परतीच्या पावसाला सुरुवात झाली होती. 23 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातून मान्सूनने काढता पाय घेतला आहे. त्यामुळे आरोग्यासाठी सर्वात फलदायी असलेला हिवाळ्याची चाहुल लागली आहे.

दिवाळीतील नरकचतुर्दशी रोजी सकाळी अभ्यंग स्नान करण्याची महाराष्ट्रात परंपरा आहे. पहाटेच उठलेल्या नागरिकांना सकाळची थंडीही जाणवली. दिवाळी पहाटनिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांना हिवाळ्याची जाणीव झाली.

इथून पुढे राज्यातील किमान तापमानात घट होण्यास सुरुवात होईल. 23 ऑक्टोबर रोजी राज्यात कुठेही पावसाची नोंद नाही, अशी माहिती हवामान विभागाचे तज्ज्ञ के एस होसळीकर यांनी दिली.

महाराष्ट्रासाठी ही आनंदाची बाब असली तरी देशातील काही भागांवर चक्रिवादळामुळे अलर्ट जारी करण्यात आलाय. रविवारी बंगालच्या खाडीवर सितरंग चक्रिवादळ धडकलं आहे.

बांग्लादेशात या वादळाचा जोरदार तडाखा बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे . तेथील तिनकोना बेट आणि सँडविप बरिसल भागात वादळामुळे भुस्खलन होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

चक्रीवादळ निरीक्षण विभागाचे प्रभारी आनंद कुमार दास म्हणाले, सितरंग चक्रीवादळ काही तास विक्राळ रुप धारण करेल. त्यानंतर त्याचा प्रभाव कमी कमी होत जाईल.

थायलंडने या वादळाला सितरंग दाव दिलं आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते, या वागळामुळे पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस होईल. तसेच ओडीशातील उत्तर भागालाही या वादळाचा तडाखा जाणवले.

पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांतील नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना या वादळाचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. पश्चिम बंगाल हवामान विभागाने सागरी किनारपट्टीवरील नागरिकांना अलर्ट जारी केला आहे.

मच्छिमारांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.