AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वजन कमी करण्यासाठी आणि पचनसंस्था सुधारण्यासाठी रामबाण उपाय आहे पपई

पपई हे फळ अनेक गुणधर्मांनी समृद्ध आहे. पपई खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे, वजन कमी करणे तसेच पचन संस्थेची कार्यक्षमता सुधारण्यास देखील पपई फायदेशीर आहे.

वजन कमी करण्यासाठी आणि पचनसंस्था सुधारण्यासाठी रामबाण उपाय आहे पपई
| Updated on: Nov 11, 2024 | 8:54 PM
Share

पपई हे फळ त्याच्या उत्कृष्ट गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे. पपई चविष्ट असण्याव्यतिरिक्त ती पोषक तत्त्वांनी देखील समृद्ध आहे. ज्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, इ, फायबर आणि अनेक अँटीऑक्सिडंट समाविष्ट आहे. पपईचे शरीराला अनेक फायदे होतात. जर तुम्ही एक महिना रोज सकाळी रिकाम्या पोटी पपई खाल्ली तर त्याचा तुमच्या शरीरावर चमत्कारिक परिणाम होऊ शकतो. रोज पपई खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घेऊया रोज पपई खाल्ल्याने कोणते फायदे होतात.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते

पपई मध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. महिनाभर पपईचे नियमित सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल. ज्यामुळे अनेक आजार हे शरीरापासून दूर राहतील. सर्दी खोकला आणि इतर संक्रमण टाळण्यासाठी देखील पपई फायदेशीर आहे.

साखरेची पातळी नियंत्रणात ठेवते

मधुमेहांच्या रुग्णांसाठी पपई फायदेशीर आहे. कारण त्यात नैसर्गिक साखरेचे प्रमाण कमी आणि फायबरचं प्रमाण जास्त असते. पपई रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते. महिन्याभर रिकाम्या पोटी पपई खाल्ल्यास शुगर लेवल नियंत्रणात राहते.

पचनसंस्था सुधारते

पपई खाल्ल्याने पचनसंस्थेची कार्यक्षमता सुधारते. यामध्ये आढळणारे एन्झाइम पपेन हे पचनास मदत करतात. महिनाभर रिकाम्या पोटी पपई खाल्ल्यास अपचन,बद्धकोष्ठता आणि गॅस सारख्या समस्यांपासून आराम मिळू शकतो.

वजन कमी करते

पपई मध्ये कॅलरी कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते.जे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला गती देऊ शकते. रिकाम्या पोटी हे खाल्ल्याने चयापचय सुधारते आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतात. ज्यामुळे वजन कमी करणे सोपे होते. महिनाभर याचे सेवन केल्याने तुम्ही तुमच्या पोटाची चरबी ही कमी करू शकतात.

त्वचेसाठी फायदेशीर

व्हिटॅमिन ए,सी आणि ई पपई मध्ये भरपूर प्रमाणात असते. जे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. हे जीवनसत्वे त्वचेच्या सुरकुत्या कमी करण्यास, मुरूम दूर करण्यास आणि त्वचेला नैसर्गिक चमक देण्यास मदत करतात. रोज सकाळी रिकाम्या पोटी पपई खाल्ल्याने त्वचेची आद्रता टिकून राहते आणि तुम्ही तरुण दिसू शकतात.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.