AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cancer | वारंवार अन्न गरम करून खाणे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक, कॅन्सरचा धोका अधिक!

बटाट्याची भाजीच नाहीतर बटाट्यापासून आपण अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करू शकतो. बटाटा खाणे देखील आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. बटाट्यामध्ये व्हिटॅमिन बी 6, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी सारखे पोषक घटक आढळतात. बटाट्याचे पदार्थ परत परत गरम करून खाल्ल्याने स्ट्रिडियम बोट्युलिनम बॅक्टेरिया वाढू शकतात.

Cancer | वारंवार अन्न गरम करून खाणे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक, कॅन्सरचा धोका अधिक!
Image Credit source: genengnews.com
| Updated on: Jun 11, 2022 | 8:40 AM
Share

मुंबई : आपल्यापैकी अनेकांना वारंवार स्वयंपाक करण्याचा कंटाळा येतो. मग काय एकदाच जास्त स्वयंपाक करून ठेवायचा फ्रीजमध्ये ठेवून परत परत गरम करून दिवसभरशिवाय रात्रीही खायचा. सध्या आपली जीवनशैली (Lifestyle) इतकी जास्त बदलली आहे की, अनेकांकडे स्वयंपाक करण्यासाठीही वेळ नाहीये. मग अशावेळी अन्न परत गरम करून खाल्ले जाते. मात्र, ही सवय आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न परत गरम करून खाल्याने त्या पदार्थातील पोषक (Nutrients) तत्वे संपतात आणि त्यामध्ये हानिकारक घटक तयार होतात. ज्यामुळे कॅन्सर होण्याची देखील 100 टक्के शक्यता असते. याशिवाय अन्न पुन्हा पुन्हा गरम करून खाल्ल्याने पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात आणि अन्नातून विषबाधा (Poisoning) होण्याचा धोकाही वाढतो. विशेषत: प्रथिनांनी समृद्ध असलेल्या वस्तू वारंवार गरम करणे अधिक हानिकारक मानले जाते.

भात

आपल्या सर्वांनाच भात खायला प्रचंड आवडते. प्रत्येक घरामध्ये भात हा बनतोच. मात्र, शिल्लक राहिलेला भात गरम करून खाण्यावर अनेकांचा भर असतो. बऱ्याच वेळा शिल्लक राहिलेल्या खिचडीचे भजे तयार करून खाल्ले जातात. फूड स्टँडर्ड्स एजन्सीच्या म्हणण्यानुसार, भात पुन्हा गरम केल्याने अन्नातून विषबाधा होण्याचा धोका वाढतो. यामुळेच भात एकदाच तयार करा आणि खा. परत परत गरम करून खाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरते.

हिरव्या भाज्या

हिरव्या पालेभाज्या खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मात्र, हिरवी भाजी परत परत गरम करून खाणे शरीरासाठी अजिबात चांगले नाहीये. कारण एकदा तयार केलेली भाजी परत गरम करून खाल्ल्याने त्यामधील पोषकतत्त्वे नष्ट होतात. तसेच त्यामध्ये हानिकारक घटकही तयार होतात. पालेभाज्यांमध्ये नायट्रेट्स भरपूर प्रमाणात असतात. ते पुन्हा गरम केल्यावर ते कार्सिनोजेनिक गुणधर्म सोडतात. यामुळे कर्करोग होण्याचा धोका अधिक होतो.

बटाटा

बटाट्याची भाजीच नाहीतर बटाट्यापासून आपण अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करू शकतो. बटाटा खाणे देखील आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. बटाट्यामध्ये व्हिटॅमिन बी 6, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी सारखे पोषक घटक आढळतात. बटाट्याचे पदार्थ परत परत गरम करून खाल्ल्याने स्ट्रिडियम बोट्युलिनम बॅक्टेरिया वाढू शकतात. आपण बटाटे एक किंवा दोन दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता. मात्र, ते गरम करून अजिबात खाऊ नका.

नॉनव्हेज

आपल्याकडे नॉनव्हेज खायला अनेकांना आवडते. नॉनव्हेज खाणारे बरेच लोक ते सेव्ह करून फ्रीजमध्ये ठेवतात. मात्र, कधीही नॉनव्हेज गरमागरम खाणेच आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. नॉनव्हेज पुन्हा पुन्हा गरम करून खाल्ल्याने त्यातील स्टेपल्सची प्रथिने खराब होण्याची शक्यता असते. फ्रीजमधून बाहेर काढणे आणि गरम करून नॉनव्हेज खाणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. यामुळे तुमचे पोट खराब होऊ शकते, अन्नातून विषबाधा होऊ शकते.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.