AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वजन जास्त, वेळ कमी? चिंता नको, सोप्या पद्धतींनी करा Weight Loss

घरात तासंतास कामे करुन वेळेला मिळेल ते खाण्यामुळे शरीरावर याचे विपरित परिणाम होत आहेत. यापासूनच निर्माण होणारी एक समस्या म्हणजे लठ्ठपणा. वेळेच्या अभावामुळे शरीराकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसतो. अशा वेळी काही सोप्या घरगुती पध्दतींमुळे तुम्ही वजन कमी करु शकतात.

वजन जास्त, वेळ कमी? चिंता नको, सोप्या पद्धतींनी करा Weight Loss
| Edited By: | Updated on: Mar 14, 2022 | 11:13 AM
Share

कोरोना काळापासून सर्वांच्याच ‘वर्क कल्चर’ (Work culture) मध्ये बराच फरक पडलेला आहे. अनेक जण अजूनही घरातूनच आपले काम करीत आहे. सतत बसून काम केल्याने तसेच वेळेच्या अभावी जे मिळेल ते खाल्ल्यामुळे याचा शरीरावर दुष्परिणाम होत आहे. काही लोकांचे वेळापत्रक इतके व्यस्त असते की ते त्यांच्या आरोग्याकडे पाहिजे तितके लक्ष देऊ शकत नाहीत. त्यामुळे अशा लोकांना वेळेपूर्वीच अनेक आजार जडतात. ज्या लोकांचे ‘शेड्यूल’ (Schedule) खूप व्यस्त असते किंवा ते काही कारणाने त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकत नाहीत, अशा लोकांचे वजन झपाट्याने वाढत असते. तासंतास एकाच जागी बसून राहणे आणि योग्य व सकस आहाराचे नियोजन न करणे यामुळे लठ्ठपणाची (Obesity) समस्या निर्माण होत असते. वजन वाढल्यामुळेही उच्चरक्तदाब, ह्रदयरोग आदींसारख्या समस्या निर्माण होत असतात.

फायबरयुक्त आहार घ्या

चुकीचा आहार आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे लोकांना पोटाच्या समस्या निर्माण होत असतात. वजन कमी करण्यासाठी पहिल्यांदा शरीराचे पाचन तंत्र चांगले असणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, पचनक्रिया सुधारण्यासाठी अशा गोष्टींचे सेवन केले पाहिजे, ज्यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. जर तुम्ही योग्य प्रमाणात फायबरचे सेवन करत असाल, तर त्यामुळे पोट स्वच्छ होईल आणि निरोगीही राहाल. फायबर घेतल्याचा फायदा म्हणजे पोट भरलेले राहते आणि जास्त वेळ भूक लागत नाही.

जिभेला आवर घाला

असे दिसून आले आहे, की व्यस्त वेळापत्रक असलेले बहुतेक लोक अति खाण्याचे बळी ठरतात. जर तुम्ही जास्त शारीरिक हालचाली करत नसाल तर चुकूनही जास्त खाऊ नका. या पद्धतीमुळे तुमचे वजन एकावेळी दुप्पट होऊ शकते. यामुळे केवळ वजन वाढत नाही तर तुम्हाला अनेक आजारांचा धोकाही निर्माण होतो. प्रमाणात खाल्लं तर शरीरातील कॅलरीजचे प्रमाण कमी होईल आणि त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल.

पुरेशी झोप घ्या

अनेक वेळा लोकांना कामामुळे थकवा जाणवतो आणि ते मर्यादेपेक्षा जास्त झोपू लागतात. तज्ज्ञांच्या मते, जास्त झोपणे हे देखील वजन वाढण्याचे एक कारण आहे. त्याऐवजी 7 ते 8 तास झोपणे चांगले. असं म्हणतात, की जास्त झोपूनही शरीरात थकवा राहतो. त्याऐवजी पुरेशी झोप घ्या. एवढेच नाही तर झोप कमी झाली तर ते हानिकारकही ठरू शकते. असे केल्याने शरीरात अधिक ऊर्जा खर्च होईल आणि तुम्हाला खाण्याची तीव्र इच्छा होईल.

संबंधित बातम्या

Health care : किडनी स्टोनच्या त्रासाने त्रस्त आहात, जाणून घ्या ‘या’ काळात कोणती फळे खावीत आणि कोणती टाळावीत!

आई शप्पथ! एका वर्षात भारतीय इतकी साखर फस्त करतात

तुम्हाला वारंवार भूक लागते का?, सावध व्हा… तुम्हाला मधुमेह असू शकतो!

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.