किडनी स्टोटनचा खूपच त्रास होतोय? दररोज इतक्या प्रमाणात पाणी प्या कधीही त्रास होणार नाही

शरीराच्या महत्वाच्या अवयवांपैकी एक म्हणून किडनी ओळखली जाते. त्यामुळे जर तुम्ही किडनी निरोगी ठेवली तर तुमचं आरोग्य उत्तम राहतं.

किडनी स्टोटनचा खूपच त्रास होतोय? दररोज इतक्या प्रमाणात पाणी प्या कधीही त्रास होणार नाही
Kidney Health
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 18, 2025 | 12:26 PM

शरीराच्या महत्वाच्या अवयवांपैकी एक म्हणून किडनी ओळखली जाते. शरीरात साचलेली घाण याच किडनीच्या मदतीने बाहेर पडत असते. त्यामुळे जर तुम्ही किडनी निरोगी ठेवली तर तुमचं आरोग्य उत्तम राहतं. शरीर सुदृढ ठेवण्यासाठी प्रत्येक अवयवाचे कार्य योग्य प्रकारे होणे अत्यंत आवश्यक आहे. किडनी रक्त फिल्टर करण्याचे काम करते. त्यामुळे किडनी निरोगी ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. पाण्याच्या मदतीने किडनीचे कार्य सुधारते आणि शरीरात साचलेली विषारी द्रव्ये बाहेर काढली जातात. आपल्या अवयवांचे कार्य योग्यरित्या चालण्यासाठी अन्न आणि पाणीदेखील आवश्यक आहे. विशेषतः मूत्रपिंडाचे कार्य सुधारण्यासाठी योग्य प्रमाणात पाण्याची गरज असते.

किडनीच्या आरोग्यासाठी पुरेसे पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. पाणी किडनीचे कार्य सुधारते आणि शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करते. शरीरातील प्रत्येक अवयवाचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी योग्य आहार आणि पाण्याची गरज असते. विशेषतः मूत्रपिंडाच्या (किडनी) आरोग्यासाठी पाण्याचे प्रमाण महत्त्वाचे आहे, कारण ते निर्जलीकरण (डिहायड्रेशन) टाळते आणि मूत्रपिंडाशी संबंधित अनेक आजारांचा धोका कमी करते.

कमी पाण्यामुळे किडनीवर परिणाम

किडनीला कार्यक्षमतेने काम करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास, डिहायड्रेशनमुळे किडनीवर थेट परिणाम होतो. यामुळे शरीरात हानिकारक कचरा साचतो, ज्यामुळे किडनीचे नुकसान होऊ शकते. अपुरे पाणी पिण्यामुळे किडनी स्टोन, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI) आणि किडनी निकामी होण्याचा धोका वाढतो.

निरोगी व्यक्तीने किती पाणी प्यावे?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, निरोगी व्यक्तीने दिवसाला साधारण 3-4 लिटर किंवा 8-10 ग्लास पाणी प्यावे. मात्र, हे प्रमाण वय, कामाचे स्वरूप, हवामान आणि शारीरिक गरजांनुसार बदलू शकते. योग्य प्रमाणात पाणी पिणे किडनीच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

किडनीच्या आजार असलेल्यांनी काय काळजी घ्यावी?

ज्यांना मूत्रपिंडाशी संबंधित आजार आहेत, त्यांनी पाण्याचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्याने ठरवावे. किडनी निकामी झालेल्या किंवा डायलिसिसवर असलेल्या रुग्णांनी कमी पाणी प्यावे, कारण जास्त पाण्यामुळे किडनीवर अतिरिक्त दबाव येऊ शकतो. अशा व्यक्तींनी वैद्यकीय सल्ल्याशिवाय पाण्याचे प्रमाण वाढवू नये.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)