AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनामुळे का वाढतंय हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण? एम्सच्या डॉक्टरांनी सांगितले कारण

कोरोना महामारीदरम्यान अनेकांचा हृदयविकारांच्या झटक्याने निधन झाले. आता कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यात आरोग्य विभागाला यश आले असले तरी देखील त्याचे परिणाम आजही लोकांना भोगावे लागत आहे. कोविडनंतर हृदयविकाराच्या घटनांमध्येही लक्षणीय वाढ झालीये. या मागचं कारण एम्सच्या डॉक्टरांनी सांगितलं आहे.

कोरोनामुळे का वाढतंय हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण? एम्सच्या डॉक्टरांनी सांगितले कारण
| Updated on: Nov 29, 2024 | 8:34 PM
Share

कोरोना महामारीने संपूर्ण जगाला हादरवलं. अनेक लोकांचा जीव गेला. अनेकांची कुटुंब उद्धवस्त झाली. कोरोनानंतर अनेक लोकांनी त्यांना वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्याचं सांगितलं. त्यापैकीच एक म्हणजे हृदयविकाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षात हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण वाढलं आहे. एम्समध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय औषध विज्ञान परिषदेत तज्ज्ञांनी असा दावा केला. या प्रकरणांमध्ये वाढ होण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे मेंदूमधून बाहेर पडणारे कॅटेकोलामाइन हार्मोन्ससह ऑक्सिडेटिव्ह ताण आहे.

ऑक्सिडेटिव्ह ताण वाढतो

एन प्रोटीन हे शरीरात AC 2 द्वारे नियंत्रित केले जातात. पण जेव्हा शरीरात ऑक्सिडेटिव्ह ताण वाढतो तेव्हा हृदयाचे ठोके वाढतात. त्यामुळे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मेंदूमधून कॅटेकोलामाइन हार्मोन्स बाहेर पडतात. याचं काम हृदयावर नियंत्रण ठेवण्याचे असते. परंतु जर जास्त प्रमाणात ते हार्मोन्स सोडले गेले तर हृदयाचे पंपिंग थांबवते, ज्यामुळे रुग्णाचा मृत्यू होतो.

दिल्ली फार्मास्युटिकल सायन्सेस आणि रिसर्च युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि इंटरनॅशनल ॲकॅडमी ऑफ कार्डिओव्हस्कुलर सायन्सेसचे अध्यक्ष डॉ. रमेश गोयल यांनी यावेळी सांगितले की, कोविड एंजियोटेन्सिन-कन्व्हर्टिंग एंझाइम 2 (ACE2) वर परिणाम करत आहे. यामुळे साइटोकिन्सची संपूर्ण रचना बदलतेय.

“यामुळे, शरीरात सायटोकायनेसिस किंवा इन्फ्लॅमेटरी मार्कर अचानक वाढतात. ज्याचा परिणाम रक्त घट्ट होऊ लागते. त्यानंतर हृदयाच्या नसांवर दबाव येतो आणि मग हृदयविकाराचा झटका येतो.”

कोविडमुळे होतो फायब्रोसिस

डॉक्टर गोयल म्हणाले की, कोविडमुळे होणाऱ्या फायब्रोसिसमुळे शरीरातील यंत्रणेत बिघाड होता. काही लोकं याला लाँग कोविड म्हणतात. यासाठी जीनोमचे विश्लेषणही आवश्यक आहे. फायब्रोसिसमध्ये एसीईची पातळी सतत तपासली गेली पाहिजे. दीर्घकाळ कोविड, ॲट्रियल फायब्रिलेशनमुळे हृदयाचे स्नायू नीट कार्य करत नाहीत. ज्यामुळे अचानक जीव गमवावा लागू शकतो. याची अनेक कारणे असू शकतात. प्रदूषण हे देखील यामागचे कारण आहे.

एम्सचे कम्युनिटी मेडिसिनचे प्राध्यापक डॉ. आनंद कृष्णन यांनी सांगितले की, 55% रुग्णांना हृदयविकाराचे गांभीर्य समजू न शकल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे हृदयविकाराची लक्षणे दिसू लागल्यास ताबडतोब रुग्णालयात पोहोचणे महत्त्वाचे असते. ज्यामुळे जीव वाचण्याची शक्यता वाढते. जेव्हा जेव्हा छातीत दुखते तेव्हा लगेच काळजी घेतली पाहिजे. डॉक्टरांना दाखवले पाहिजे. कारण समस्या वाढण्याआधीच त्यावर उपचार घेतलेले कधीही चांगले. त्यामुळे घाबरुन जाऊ नका. कोणतीही लक्षणे आढळली की डॉक्टरांचा सल्ला घ्या.

चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु
चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु.
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?.
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा.
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ.
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत.
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित.
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर.
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न.