AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला, आसिम मुनीर यांनी डोनाल्ड ट्रम्पसाठी मागितला नोबेल पुरस्कार

पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसीम मुनीर यांनी डोनाल्ड ट्रम्पसाठी शांततेच्या नोबेलचे नामांकन देण्याची शिफारस केली आहे. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना व्हाऊट हाऊसमध्ये लंचसाठी बोलवले होते.

भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला, आसिम मुनीर यांनी डोनाल्ड ट्रम्पसाठी मागितला नोबेल पुरस्कार
| Updated on: Jun 19, 2025 | 9:03 AM
Share

पाकिस्तानचे लष्करप्रमुख फिल्ड मार्शल आसिम मुनीर अमेरिका दौऱ्यावर होते. या दौऱ्यात मुनीर यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी शांततेचा नोबेल पुरस्काराची मागणी केली. ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष थांबवला, त्यांचे नोबेलसाठी नामांकन झाले पाहिजे, असे मुनीर यांनी म्हटले आहे. व्हाइट हाऊसचे प्रवक्ते एना केली यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

ट्रम्प-मुनीर भेट

व्हाइट हाऊसचे प्रवक्ते एना केली यांनी म्हटले की, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसीम मुनीर यांनी डोनाल्ड ट्रम्पसाठी शांततेच्या नोबेलचे नामांकन देण्याची शिफारस केली आहे. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना व्हाऊट हाऊसमध्ये लंचसाठी बोलवले होते. ही भेट १८ जून रोजी व्हाऊट हाऊसच्या कॅबिनेट रुममध्ये झाली. त्यात माध्यमांना सहभागी होण्याची परवानगी नव्हती.

ट्रम्प-मोदी यांच्यात चर्चा

ट्रम्प-मुनीर यांच्या बैठकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 35 मिनिटे ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चा केली. या चर्चेतही मोदी यांनी स्पष्ट केले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात जो तणाव झाला होता, तो दूर करण्यासाठी पाकिस्तानकडून पुढाकार घेण्यात आला. त्यानंतर दोन्ही देशांच्या लष्कराने संवाद साधला. तिसऱ्या कोणत्याही देशाची मध्यस्थात या तणाव दरम्यान झाली नाही. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी म्हटले की, भारत आपल्या द्विपक्षीय मुद्यांवर तिसऱ्या पक्षाची मध्यस्था कधीही स्वीकारणार नाही.

डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार दावा केला की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष मी थांबवला. भारतानेही अनेक वेळा ट्रम्प यांचा हा दावा फेटाळून लावला. दोन्ही देशांच्या संघर्षात तिसऱ्या देशाची मध्यस्था स्वीकारण्यात आली नाही आणि भविष्यातही स्वीकारण्यात येणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्पष्ट केले होते.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवले. त्यात पाकिस्तानमधील ९ लष्करी तळ नष्ट केली होती. त्यानंतर पाकिस्तानकडून झालेला हल्ला भारताने परतवून लावत जोरदार प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे हादरलेल्या पाकिस्तानने चर्चेसाठी पुढाकार घेत शस्त्रसंधी केली होती.

Follow Us
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क...
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क....
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह...
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह....
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं.
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका.
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च.
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात.
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह.
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र.
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका.
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा.