AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत आणि बांगलादेशातील शेतकऱ्यांत मोठी झडप, BSF ने अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

या धुमश्चक्रीची बातमी कळताच भारताची बीएसएफ आणि बांगलादेशतच्या बीजीबीच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत आप-आपल्या शेतकऱ्यांना आवरुन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. दोन्ही देशाचे सैनिक आपआपल्या नागरिकांना त्यांच्या देशात पाठवले आहे. या घटनेत कोणीही जखमी झाल्याची माहिती आलेली नाही.

भारत आणि बांगलादेशातील शेतकऱ्यांत मोठी झडप, BSF ने अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या
| Updated on: Jan 18, 2025 | 8:45 PM
Share

एकीकडे बांगलादेशच्या पीएम शेख मेहबुबा पदच्युत झाल्यानंतर भारत आणि बांगलादेशातील संबंध तितकेचे चांगले राहीलेले नाहीत. तेथील अंतरिम सरकारने देखील भारतावर टीका करणे सुरु ठेवले आहे. पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्याला लागून असलेल्या बांगलादेशाच्या सुखदेव सीमेवर भारत आणि बांग्लादेश यांच्या सीमेवर शनिवारी जोरदार चकमक उडाली आहे. काही लोक बांगलादेशची सीमा ओलांडून घुसखोरी करीत होते. त्यावेळी सुखदेवपुरच्या गावकऱ्यांनी बांगलादेशी नागरिकांचा पाठलाग केला, तेव्हा दोन्ही गटात मोठी दगडफेक झाली. परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी अखेर बीएएसएफने अश्रुधऱांच्या नळकांड्या फोडत परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला.

भारत आणि बांग्लादेशातील शेतकऱ्यांत झडप

शुक्रवारी रात्रीपासून बांगलादेश आणि भारत सीमेवर मोठा तणाव आहे. आता स्थिती तणावाची असली तरी नियंत्रणात आहे. दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यात मोठी चकमक उडाली आहे. परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी अखेर बीएसएफ अश्रुधरुच्या नळकांड्या फोडत परस्थितीवर नियंत्रण मिळविले आहे. बांगलादेशातील सीमावर्ती भागातील शेतकरी पळून गेले आहेत. याआधी बीजीबीने सीमांवर काटेरी कुंपण घालायला वारंवार विरोध केला होता.

बीएसएफने प्रसिद्धी पत्रक जारी करीत शनिवारी सकाळी ११.४५ वाजता ११९ व्या वाहिनीच्या सीमाचौकी सुखदेवपूरच्या भारत आणि बांगलादेशाच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर भारतीय आणि बांगलादेश शेतकऱ्यांमध्ये छोट्याशा कारणावरुन वादंग निर्माण झाला आहे. हा प्रकार तेव्हा झाला तेव्हा काही भारतीय शेतकरी नेहमीप्रमाणे आंतरराष्ट्रीय सीमेजवळ असणार्‍या शेतात काम करण्यासाठी पुढे गेले होते.

परस्परांवर दगडफेकीचा आरोप

भारतीय शेतकऱ्यांनी बांगलादेशच्या शेतकऱ्यांवर पिक चोरल्याचा आरोप केला आहे.ज्यामुळे दोन्ही देशांच्या शेतकऱ्यांमध्ये वाद झाला.या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. दोन्ही बाजूने मोठा जमाव जमल्यानंतर एकमेकांना शिवीगाळ करणे सुरु झाले.त्यानंतर एकमेकांवर दगड फेक केल्याचा आरोप दोन्ही गटांनी केला आहे. सीमेवर अनेक भागात तारांचे कुंपण नसल्याने भारतीय शेतकरी दूरपर्यंत सीमेपलिकडील आपल्या शेतात जात असतात.

Follow Us
दुबईमध्ये काय घडले? प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं
दुबईमध्ये काय घडले? प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं.
अन्नाच्या शोधात पडला बाहेर अन्...; दुबईतून मराठी माणसाचा व्हिडीओ समोर
अन्नाच्या शोधात पडला बाहेर अन्...; दुबईतून मराठी माणसाचा व्हिडीओ समोर.
इराण युद्धाचा केळी उत्पादकांना फटका, करमाळ्यात 1,200 कंटेनर पडून
इराण युद्धाचा केळी उत्पादकांना फटका, करमाळ्यात 1,200 कंटेनर पडून.
रोहित पवार उद्या पुन्हा पत्रकार परिषद घेणार; कोणते नवे मुद्दे मांडणार?
रोहित पवार उद्या पुन्हा पत्रकार परिषद घेणार; कोणते नवे मुद्दे मांडणार?.
भारतातील पहिले आणि शेवटचे ग्रहण! आज दिसणार खग्रास, खंडग्रास चंद्रग्रहण
भारतातील पहिले आणि शेवटचे ग्रहण! आज दिसणार खग्रास, खंडग्रास चंद्रग्रहण.
हज यात्रेसाठी गेलेले येवल्यातील 6 पर्यटक मक्का शहरात अडकले
हज यात्रेसाठी गेलेले येवल्यातील 6 पर्यटक मक्का शहरात अडकले.
मी कधी होळी खेळत नाही, पण...; होळी उत्सवात गौतमी पाटीलचा सहभाग
मी कधी होळी खेळत नाही, पण...; होळी उत्सवात गौतमी पाटीलचा सहभाग.
जय पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडीओवर भुजबळांकडून मोठा खुलासा!
जय पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडीओवर भुजबळांकडून मोठा खुलासा!.
मुलगा कुवेतमध्ये अडकला; अभिनेत्री विशाखा सुभेदारांना अश्रु अनावर
मुलगा कुवेतमध्ये अडकला; अभिनेत्री विशाखा सुभेदारांना अश्रु अनावर.
अंबादास दानवेंकडून संभाजीनगरात पदाधिकाऱ्यांसोबत रंगोत्सव साजरा
अंबादास दानवेंकडून संभाजीनगरात पदाधिकाऱ्यांसोबत रंगोत्सव साजरा.