AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी नोटेवरुन हटवलं आता राष्ट्रीय घोषणा ही रद्द; बांगलादेशमध्ये काय घडतंय?

बांगलादेशमध्ये राजकीय परिस्थिती बिघडली आहे. देशातील परिस्थितीवर जगभरातील लोकांनी चिंता व्यक्त केली आहे. शेख हसीना यांचं सरकार पाडल्यानंतर आलेल्या काळजीवाहू सरकारने त्यांचं अस्तित्व मिटवण्याचं काम सुरु केले आहे. आधी नोटेवरुन फोटो हटवला आणि आता त्यांनी दिलेला नारा ही रद्द केला.

आधी नोटेवरुन हटवलं आता राष्ट्रीय घोषणा ही रद्द; बांगलादेशमध्ये काय घडतंय?
shailesh musale
shailesh musale | Updated on: Dec 10, 2024 | 5:26 PM
Share

Bangladesh : बांगलादेशात शेख मुजीबुर रहमान यांची ओळख पुसण्यासाठी सत्तेत आलेलं तात्पुरतं सरकार प्रयत्न करत आहे. आधी चलनी नोटांवरून शेख मुजीबुर रहमान यांचा फोटो काढून टाकण्यात आला आणि आता ‘जय बांगला’ हा राष्ट्रीय घोषणेला दिलेला राष्ट्रीय दर्जाही हटवण्यात आला आहे. अंतरिम सरकारने उच्च न्यायालयात ऐतिहासिक निर्णयाला आव्हान दिले होते. त्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले. ‘जय बांगला’ ही घोषणा 1971 च्या स्वातंत्र्य लढ्याचे प्रतीक आहे. बांगलादेशचे पहिले पंतप्रधान शेख मुजीबुर रहमान यांनी ती लोकप्रिय केली होती. 2020 मध्ये शेख हसीना सरकारच्या काळात उच्च न्यायालयाने या घोषणेला राष्ट्रीय घोषणा म्हणून घोषित केले होते. सरकारी कार्यक्रम, राष्ट्रीय दिवस आणि शैक्षणिक संस्थांमध्ये त्याचा वापर अनिवार्य करण्यात आला होता.

सर्वोच्च न्यायालयाची उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती

मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देत ​​‘जय बांगला’चा राष्ट्रीय नारा म्हणून दिलेला दर्जा रद्द केलाय. सरन्यायाधीश सय्यद रिफात अहमद यांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. अतिरिक्त ऍटर्नी जनरल अनिक आर हक म्हणाले, “‘जय बांगला’ यापुढे राष्ट्रीय नारा म्हणून ओळखला जाणार नाही.”

नोटेवरुन फोटो हटवला

बांगलादेशची राजकीय स्थिती झपाट्याने बदलत आहे. देशाची सांस्कृतिक चिन्हे ही बदलली जात आहेत. शेख मुजीबुर रहमान यांचा फोटो याआधीच नोटांवरून काढून टाकण्यात आलाय. आता ‘जय बांगला’ हा नारा हटवण्यात आल्याने बांगलादेशचे नवे अंतरिम सरकार शेख मुजीब यांचा वारसा नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचं समोर येत आहे.

बांगलादेशमध्ये राजकीय संकट

5 ऑगस्ट रोजी शेख हसीना यांचं सरकार पाडल्यानंतर बांगलादेशात मोठ्या प्रमाणात अस्थिरता निर्माण झाली आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकार ज्या प्रकारे पाऊलं उचलत आहे. त्यावरुन हे दिसून येतंय की, त्यांना देशाची स्थिती पूर्णपणे बदलायची आहे. देशाच्या राजकारणात यामुळे नवीन वाद सुरु होऊ शकतो. मुजीब समर्थक या विरोधात रस्त्यावर उतरु शकतात. बांगलादेशमधील राजकीय भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

Follow Us
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
आता प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप; लवकरच...
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
Dattatray Bharne | कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, रोहित पवारांच्या उपोषणामुळे हालचाली वाढल्या, नेमकं काय घडतंय?
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक CCTV फुटेज समोर!
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,  ठाकरेंच्या नगरसेवकाला... नेमकं प्रकरण काय?
भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला अन्....
मोठी बातमी! भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला आणि पायाला दुखापत
40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
Dhiraj Seth | भारतीय लष्कराला नवे सेनाप्रमुख! 40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ; नेमकं काय सांगितलं?