मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांचं डोकं आता आलं ठिकाण्यावर, भारताबाबत करु लागले सलोख्याची भाषा

मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांना सल्ला दिला आहे. मालदीवने हट्टी भूमिका घेणे थांबवावे आणि भारतासोबत चर्चा करावी. आम्हाला मदत करणारे अनेक पक्ष आहेत. सोलिह यांनी मुइज्जू यांना धारेवर घेतलं आहे.

मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांचं डोकं आता आलं ठिकाण्यावर, भारताबाबत करु लागले सलोख्याची भाषा
shailesh musale | Updated on: Mar 25, 2024 | 8:27 PM

माले : मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी देशाचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांना आपला हट्टीपणा सोडून शेजारी देश भारताशी चर्चा करुन आर्थिक आव्हानांना सामोरे जाण्याचा सल्ला दिला आहे. सोलिह यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा मालदीवचे अध्यक्ष मुइज्जू यांच्याकडे जगभरात चीन समर्थक नेते म्हणून पाहिले जात आहे. सोलिह यांनी मुइज्जू यांना आपली ‘हट्टी’ वृत्ती सोडून आर्थिक आव्हानांना तोंड देण्यासाठी शेजाऱ्यांशी वाटाघाटी करण्याचा सल्ला दिला आहे. सोलिह यांची ही टिप्पणी तेव्हा आली आहे जेव्हा काही दिवसांपूर्वी चीन समर्थक समजल्या जाणाऱ्या मुइज्जू यांनी भारताला या कर्जमुक्ती देण्याची विनंती केली होती.

मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टीच्या (एमडीपी) उमेदवारांना पाठिंबा मिळवण्यासाठी माले’मध्ये आयोजित कार्यक्रमात संबोधित करताना, सोलिह म्हणाले की, मुइज्जू यांनी कर्जाच्या पुनर्गठनाचा विचार करत असल्याचे सूचित करणारे मीडिया रिपोर्ट्स पाहिले आहेत. त्यासाठी भारताशी बोलायचे आहे.. “परंतु आर्थिक आव्हाने भारताच्या कर्जामुळे नाहीत,” असे सोलिह म्हणाले

मालदीव चीनचा कर्जबाजारी

सोलिह म्हणाले की, मालदीववर चीनवर 18 अब्ज मालदीवियन रुफिया (MVR) कर्ज आहे, तर भारताचे 8 अब्ज MVR कर्ज आहे आणि त्याची परतफेड करण्याची मुदत देखील 25 वर्षे आहे.  मला खात्री आहे की आमचे शेजारी मदत करतील. आपण हट्टी भूमिका घेणे थांबवले पाहिजे आणि बोलणे सुरू केले पाहिजे. आम्हाला मदत करणारे अनेक पक्ष आहेत. पण त्यांना (मुइज्जू) तडजोड करायची नाही. मला वाटते की त्यांनी (सरकार) आता परिस्थिती समजून घेण्यास सुरुवात केली आहे. ते सरकार जनतेची फसवणूक करत आहे आणि एमडीपी सरकारने सुरू केलेले प्रकल्प पुन्हा सुरू करत आहेत. ते खोटे लपवण्यासाठी मंत्री आता खोटे बोलत असल्याचे ते म्हणाले.

मुइज्जू यांची भारतावर टीका

अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आणि नंतर मुइज्जू यांनी भारतावर टीका केली होती. नोव्हेंबरमध्ये त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत. मानवतावादी आणि वैद्यकीय निर्वासनासाठी वापरल्या जाणाऱ्या मालदीवमधील तीन विमान तळांवर तैनात असलेल्या 88 भारतीय लष्करी कर्मचाऱ्यांपैकी 10 मे पर्यंत त्यांनी संपूर्ण माघार घेण्याची मागणी केली आहे. 26 भारतीय लष्करी कर्मचाऱ्यांचे पहिले पथकाने मालदीव सोडले आहे आणि त्यांच्या जागी गैर-लष्करी कर्मचाऱ्यांनी नियुक्त केले आहे.

भारताबाबत आता सलोख्याची भाषा

मुइज्जू यांनी आपल्या पहिल्या मीडिया मुलाखतीत असा दावा केला आहे की आपण असे कोणतेही पाऊल उचलले नाही किंवा असे कोणतेही विधान दिले नाही ज्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण होईल. मुइज्जू म्हणाले की भारत मालदीवचा सर्वात जवळचा मित्र राहील आणि त्याबद्दल कोणताही प्रश्न नाही. मालदीवमध्ये 21 एप्रिल रोजी होणाऱ्या संसदीय निवडणुकांपूर्वी ते आता भारताप्रती सलोख्याची भाषा करत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us