AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India-Pakistan War : युद्धात एकट्या पाकिस्तानच नाही, अरब देशांचही मोठं नुकसान होईल, कसं ते समजून घ्या

India-Pakistan War : आमने-सामनेच्या युद्धात फक्त दोन देश जळत नाहीत, तर इतरही देश ज्वाळांमध्ये भाजून निघतात. रशिया-युक्रेन युद्ध असो किंवा इस्रायल-हमास सगळ्या जगावर याचा परिणाम दिसून आला. आता भारत-पाकिस्तान दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावर आहेत. हे युद्ध सुरु झाल्यास अरब देशांना मोठा फटका बसेल, कसं ते जाणून घ्या.

India-Pakistan War : युद्धात एकट्या पाकिस्तानच नाही, अरब देशांचही मोठं नुकसान होईल, कसं ते समजून घ्या
Arab World
| Updated on: May 01, 2025 | 10:06 PM
Share

भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेला तणाव कुठल्याही क्षणी मोठ्या युद्धाच रुप धारण करु शकतो. आर्थिक संकटात असलेल्या फक्त एकट्या पाकिस्तानचं भविष्य धोक्यात नाहीय, तर अरब जगतलाही हे युद्ध नकोय. कारण यात त्यांचं सुद्धा नुकसान आहे. गाजा युद्ध आणि अमेरिका-इस्रायलचा इराणसोबत तणाव यामुळे अरब देश आधीपासूनच चिंतेत आहेत. आता पाकिस्तान पूर्णपणे युद्धात उतरला, तर या देशांच्या सुरक्षेला आव्हान निर्माण होऊ शकतं. याचं मुख्य कारण आहे, पाकिस्तान अरब देशांचा सैन्य सहकारी आहे. पाकिस्तान आणि अरब देशांमध्ये रणनितीक संबंधांऐवजी इस्लामवर आधारित सांस्कृतीक आणि धार्मिक संबंध सुद्धा आहेत. 50 पेक्षा जास्त मुस्लिम देशांची संघटना असलेली OIC सुद्धा दोन्ही देशांमध्ये संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत असते. इस्लामिक जगतात पाकिस्तान स्वत:ला सैन्य शक्ती असलेला देश म्हणून सादर करतो. त्यामुळे अरब देशांसोबत पाकिस्तानची सैन्य भागीदारी सुद्धा आहे.

पाकिस्तानी सैन्य जवळपास 22 अरब देशांमध्ये आहे. तिथे पाक सैन्याचे अधिकारी प्रशिक्षण आणि रणनितीक भागीदारीची भूमिका अदा करतात. इराण, येमेनमधील हुती बंडखोर आणि ISIS सारख्या दहशतवादी संघटनेमुळे आखाती देशांना एक भरवशाच्या सैन्य सहकाऱ्याची गरज आहे. पाकिस्तानी सैन्य त्यांना यामध्ये मदत करतं. अरब देशांकडे जे सैन्य आहे, त्यांना मोठं युद्ध लढण्याचा किंवा दहशतवादी हल्ल्याचा सामना करण्याचा फारसा अनुभव नाहीय. त्यामुळे हे देश इस्रायल आणि इराणकडून असलेल्या धोक्यामुळे पाकिस्तानी सैन्यावर बऱ्याच प्रमाणात अवलंबून आहेत. इस्लामिक जगतात पाकिस्तान एकमेव अणवस्त्र संपन्न देश आहे. त्यामुळे सौदी अरेबियासारख्या देशांना पाकिस्तान रणनितीक दृष्ट्या महत्त्वाचा वाटतो. खासकरुन अरब देशांची इराणबरोबर स्पर्धा आहे. त्यामुळे त्यांना पाकिस्तान जास्त जवळचा वाटतो.

इराणकडून थेट धमकी

या कठीण काळात पाकिस्तान अस्थिर झालेला या देशांना परवाडणार नाहीय. कारण मध्यपूर्वेत इस्रायल विरुद्ध आवाज बुलंद होत आहे. दुसऱ्याबाजूला इराणने थेट धमकी दिलीय. अमेरिका आणि इस्रायलला हल्ल्यासाठी अरब देशांनी आपल्या क्षेत्राचा वापर करु दिला, तर इराण या देशांवरही आक्रमण करेल अशी धमकी त्यांनी दिली आहे.

म्हणून अरब देश शांततेच आवाहन करतायत

अशा स्थितीत पाकिस्तान कमजोर होण्याचा अर्थ थेट अरब देशांची सुरक्षा कमजोर होणं. पाकिस्तानी सैन्याचा नियमितपणे सौदी अरेबिया आणि UAE या देशांबरोबर युद्ध सराव चालतो. यामुळे त्यांच्या सैन्य क्षमतेमध्ये वाढ होते. इतिहासात अनेकदा पाकिस्तानी सैन्य अरब देशांसाठी कणा बनून उभं राहिलय. म्हणूनच भारतासोबत तणाव निर्माण झाल्यानंतर सौदी अरेबिया, यूएई आणि कतार सारख्या अरब देशांनी शांततेच आवाहन केलय.

Follow Us
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....
पंतप्रधानांच्या आवाहनाचे अनोखे स्वागत! महापौरांनी इलेक्ट्रिक बाईकने...
पंतप्रधानांच्या आवाहनाचे अनोखे स्वागत! महापौरांनी इलेक्ट्रिक बाईकने....
पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यावर टीका करणाऱ्यांना फडणवीसांनी सुनावलं
पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यावर टीका करणाऱ्यांना फडणवीसांनी सुनावलं.
सरकारी ताफ्याला ब्रेक! वर्षा ते विधान भवन, मुख्यमंत्री ऑन बाईक......
सरकारी ताफ्याला ब्रेक! वर्षा ते विधान भवन, मुख्यमंत्री ऑन बाईक.......
25 लाखात चक्क 16 महिने... 20 वर्ष जुन्या हत्या प्रकरणाचा निकाल, NCP...
25 लाखात चक्क 16 महिने... 20 वर्ष जुन्या हत्या प्रकरणाचा निकाल, NCP....
मी ईश्वर साक्ष ठेवून शपथ घेतो की... 10 विधान परिषद सदस्यांनी घेतली शपथ
मी ईश्वर साक्ष ठेवून शपथ घेतो की... 10 विधान परिषद सदस्यांनी घेतली शपथ.
तुम्हालाही हे माहीत हवं... फडणवीस सरकारचा काटकसरीचा फॉर्म्युला!
तुम्हालाही हे माहीत हवं... फडणवीस सरकारचा काटकसरीचा फॉर्म्युला!.
VIP गाडी नाही, थेट बसने प्रवास! नितीन गडकरींची पुण्यातील एंट्री चर्चेत
VIP गाडी नाही, थेट बसने प्रवास! नितीन गडकरींची पुण्यातील एंट्री चर्चेत.