रात्री 8 वाजता सर्व उद्ध्वस्त होणार, इराणचे नागरिकांना मोठे आवाहन, थेट मानवी..
इराण आणि अमेरिका युद्ध पेटले आहे. एक महिन्यापेक्षा अधिक काळापासून युद्ध सुरू आहे. मात्र, आता विनाशाला सुरूवात होणार असल्याचे दिसत आहे. अमेरिकेकडून देण्यात आलेल्या धमकीचा वेळ संपत आहे. घातक हल्ले केले जाऊ शकतात. यादरम्यानच मोठी बातमी पुढे येत आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर आणि ब्रिजवर मंगळवारी रात्री 8 वाजता मोठा हल्ला केला जाईल म्हटले. इराणला पाषाण युगात पाठवायचे असल्याचेही त्यांनी म्हटले. भारतीय वेळेनुसार, बुधवारी 3.30 वाजता अमेरिका इराणवर घातक हल्ला करणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी करार करण्याकरिता इराणला 48 तासाचा वेळ दिला. तो वेळ मंगळवारी रात्री 8 वाजता संपणार आहे. त्यानंतर इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले केले जाणार आहेत. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मोठ्या धमकीनंतरही इराण माघार घेत नाही. यादरम्यानच डोनाल्ड ट्रम्प यांचा डाव उलटून टाकण्यासाठी इराणकडून मास्टर प्लॅन तयार करण्यात आला. इराण सरकारकडून आपल्या जनतेला मोठे आवाहन करण्यात आले. इराण सरकारने आपल्या देशातील युवकांना ऊर्जा प्रकल्पांभोवती मानवी साखळी करून उभे राहण्याचे आवाहन केले.
ऊर्जा प्रकल्पांच्या चारही बाजूने मानवी साखळी तयार करून उभे राहा, असे म्हटले. इराणच्या क्रिडा मंत्रालयाने खेळाडू, कलाकार आणि विद्यार्थ्यांना मोठे आवाहन केले. क्रीडा मंत्रालयाने म्हटले की, मंगळवारी दुपारी 2 वाजता सर्वांनी ऊर्जा प्रकल्पांजवळ जमावे. यावेळी खेळाडू, कलाकार आणि देशातील तरूण निषेध देखील करतील. मानवी साखळी तयार करून त्यांच्याकडून आपल्या देशाच्या ऊर्जा प्रकल्पांचे संरक्षण केले जाईल.
अमेरिकेकडून इराणमधील ब्रिज आणि ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला केला जाईल, अशी धमकी देण्यात आली. मात्र, तरीही इराण मागे हटत नाही. करार स्विकारण्यापेक्षा इराणकडून प्लॅन बी तयार करण्यात आला. म्हणजेच थोडक्यात काय तर अमेरिकेच्या धमकीनंतरही इराण होर्मुज खाडी खुली करणार नाही किंवा करारही करणार नाही. युद्ध थांबवण्याकरिता इराणच्या काही प्रमुख मागण्या आहेत.
जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत, तोवर आम्ही मागे हटणार नाहीत, ही त्यांची भूमिका आहे. तेहरान रात्री 8 वाजता आत्मसर्मपण करणार नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये युद्ध थांबले पाहिजे, ही जगाची भूमिका आहे. या युद्धात जग होरपळत आहे. जर युद्ध भडकले तर त्याचा अत्यंत गंभीर परिणाम होईल. इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेशिवाय जगातील सर्वच देश युद्धातून बाजूला आहेत. मात्र, परिणाम तर सर्वांनाच भोगावे लागत आहेत.