AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला करणार…’, भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पाकला अल्टीमेटम देताना शस्त्रसंधीबाबत केले महत्वाचे वक्तव्य

पाकिस्तान उघडपणे दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत आहे. त्यानंतर त्या दहशतवाद्यांना भारतात पाठवत आहे. आता हे आम्ही सहन करणार नाही. पाकिस्तानने दहशतवादी संघटना आणि दशतवाद्यांना मदत करण्याचे सुरुच ठेवले तर...

'पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला करणार...', भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पाकला अल्टीमेटम देताना शस्त्रसंधीबाबत केले महत्वाचे वक्तव्य
jaishankar
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 10, 2025 | 9:14 AM
Share

भारत आणि पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधी झाली आहे. परंतु दोन्ही देशांतील तणावाचे कारण संपलेले नाही. यामुळे भारताने ऑपरेशन सिंदूर संपलेले नाही तर स्थगित केल्याचे वारंवार स्पष्ट केले आहे. आता जर पाकिस्तानने पुन्हा भारताला चिथावणी दिली तर भारत पाकिस्तानच्या आत कुठेही हल्ला करण्यास तयार आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी ब्रुसेल्सच्या भेटीदरम्यान पॉलिटिकोशी बोलताना हे वक्तव्य केले. भारतीय परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले की, पाकिस्तान हा एक असा देश आहे, जो दहशतवादाचा वापर देशाचे धोरण म्हणून करतो. हाच कळीचा मुद्दा आहे.

पॉलिटिकोशी बोलताना डॉक्टर जयशंकर म्हणाले, ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताचे लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानचे मोठे नुकसान केले. त्यामुळे पाकिस्तान गुडघे टेकत शस्त्रसंधीसाठी तयार झाला. राफेल असो की इतर क्षेपणास्त्रे हे किती प्रभावित होते, त्याचा पुरावा पाकिस्तानचे नष्ट झालेली हवाईतळ आहेत.

१० मे रोजी नेमके काय घडले, ते सांगताना एस.जयशंकर यांनी सांगितले की, भारत आणि पाकिस्तानमधील हल्ले १० मे रोजी एकाच कारणामुळे थांबले. त्या दिवशी सकाळी आम्ही आठ पाकिस्तानी हवाई तळांवर हल्ले केले. त्या हवाई तळांचे प्रचंड नुकसान केले. माझ्या शब्दांवर विश्वास ठेऊ नका, परंतु उपग्रहद्वारे गूगलवर उपलब्ध असलेल्या फोटोंवर विश्वास ठेवा. ज्या धावपट्टीवर आणि रन वे वर हल्ले झाले, त्याचे फोटो तुम्ही पाहू शकतात.

एस.जयशंकर यांनी पाकिस्तानला कठोर शब्दांत ईशारा दिला. ते म्हणाले, पाकिस्तान उघडपणे दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत आहे. त्यानंतर त्या दहशतवाद्यांना भारतात पाठवत आहे. आता हे आम्ही सहन करणार नाही. आमचा पाकिस्तानला स्पष्ट संदेश आहे. पाकिस्तानने दहशतवादी संघटना आणि दशतवाद्यांना मदत करण्याचे सुरुच ठेवले तर पाकिस्तानच्या कोणत्या भागात ते दहशतवादी आहेत, त्याचा विचार आम्ही करणार नाही. ते जेथे असतील त्या ठिकाणी जाऊन आम्ही कारवाई करणार आहोत.

२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी २६ नागरिकांची हत्या केली होती. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानमधील लष्कर-ए-तैयबाच्या ‘द रेझिस्टंट फ्रंट’ या संघटनेने स्वीकारली होती. यानंतर पाकिस्तानात बसलेल्या दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी भारताने ६ आणि ७ मे रोजी रात्री ऑपरेशन सिंदूर सुरू केले. यामध्ये पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेल्या दहशतवाद्यांची तळे उद्ध्वस्त केली. त्यानंतर पाकिस्तान १० मे रोजी शस्त्रसंधीसाठी भारताकडे भीक मागितली.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत