AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तुम्ही पाणी थांबवले तर…’ पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भारताला थेट धमकी

पाकिस्तान २४ कोटी लोकांचा देश आहे. आम्ही आमच्या शूर सशस्त्र दलांच्या मागे नेहमी उभे राहणार आहे. हा संदेश स्पष्ट आहे. शांतता आमची प्राथमिकता आहे. परंतु आम्ही आमच्या अखंडतेशी आणि सुरक्षिततेशी कधीही तडजोड करणार नाही.

'तुम्ही पाणी थांबवले तर...' पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भारताला थेट धमकी
| Updated on: Apr 26, 2025 | 12:10 PM
Share

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांच्या विरोधात कारवाई केली आहे. भारताने सिंधु पाणी करार संपवला आहे. त्यामुळे पाकिस्तानची चांगलीच घाबरगुंडी उडाली आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांपासून विरोधी नेत्यांपर्यंत भारताला धमकवले जात आहे. पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पाकिस्तानचे पाणी कमी केले किंवा थांबवले तर पूर्ण ताकदीने उत्तर दिले जाणार असल्याचे म्हटले आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी म्हटले की, आम्ही कोणत्याही प्रकारच्या धाडसाला उत्तर देण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. याबद्दल कोणीही चूक करू नये. पाकिस्तान २४ कोटी लोकांचा देश आहे. आम्ही आमच्या शूर सशस्त्र दलांच्या मागे नेहमी उभे राहणार आहे. हा संदेश स्पष्ट आहे. शांतता आमची प्राथमिकता आहे. परंतु आम्ही आमच्या अखंडतेशी आणि सुरक्षिततेशी कधीही तडजोड करणार नाही.

बिलावल भुट्टो बडबडला…

पाकिस्तान पीपुल्स पार्टीचे अध्यक्ष असलेले बिलावल भुट्टो यांनीही भारताला धमकी दिली आहे. सखर येथे सिंधु नदीच्या किनाऱ्यावर घेतलेल्या सभेत बिलावल भुट्टो म्हणाले, मी सिंधु खोऱ्याच्या जवळ उभा राहून सांगतो. सिंधु नदी आमची आहे. आमचीच राहणार आहे. या नदीतून आमचे पाणी वाहील किंवा त्यांचे रक्त वाहील. संपूर्ण सिंधु खोरे आमचे आहे, आमचेच राहणार आहे.

बिलावल भुट्टो भारताला रक्तपाताची धमकी देऊन थांबले नाही. त्यांनी आमचे सैन्य हल्ला करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. भारत सिंधु नदीतील पाणी कोणाचे आहे, त्याचा निर्णय घेऊ शकत नाही. अन्यथा पाकिस्तानी जनता आणि सैन्य उत्तर देण्यास तयार असल्याचे भुट्टो यांनी म्हटले आहे.

पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारताने कठोर पावले उचलत पाच निर्णय घेतले. त्यात सिंधु पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. १९६० मध्ये हा करार झाल्यानंतर प्रथमच रद्द करण्यात आला. त्यामुळे पाकिस्तान चांगलाच संतापला आहे.

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.