AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानमध्ये महागाईचा कहर, शहरांनंतर आता गावही उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर

गाव आणि शहरांमध्ये खाण्या-पिण्याच्या वस्तूंमध्ये वेगवेगळ्या स्तरावर महागाई पाहायला मिळाली. यामध्ये मोठी तफावत पाहायला मिळाली. स्‍टेट

पाकिस्तानमध्ये महागाईचा कहर, शहरांनंतर आता गावही उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Feb 02, 2021 | 11:49 AM
Share

इस्लामाबाद : आधीच पाकिस्तानची आर्थिक स्थिती तेवढी चांगली नाही (Pakistan Rural Areas Food Inflation). त्यात आता वाढत्या महागाईने पाकिस्तानच्या जनतेच कंबरडं मोडलं आहे. शहरच नाही तर आता गावांनाही याची झळ लागत आहे. पाकिस्तानच्या मीडियानुसार, 2020 च्या दुसऱ्या भागात पाकिस्तानचे गाव आणि शहरांमधील अंतर वाढलं आहे (Pakistan Rural Areas Food Inflation).

गाव आणि शहरांमध्ये खाण्या-पिण्याच्या वस्तूंमध्ये वेगवेगळ्या स्तरावर महागाई पाहायला मिळाली. यामध्ये मोठी तफावत पाहायला मिळाली. स्‍टेट बँक ऑफ पाकिस्‍तानच्या (एसबीपी) रिपोर्टमध्ये महागाईचे वाढलेले आकडे देण्यात आले आहेत.

खाण्या-पिण्याच्या गोष्टी महागल्या

एसबीपीच्या रिपोर्टनुसार, गेल्या 12 महिन्यांमध्ये खाण्या-पिण्याच्या वस्तूंच्या दरात तेजी आली आहे. शहर आणि गाव दोघांनाही याची झळ बसली आहे. पण, गावात शहरापेक्षा जास्त महागाई रेकॉर्ड करण्यात आली आहे. एसबीपीच्या रिपोर्टनुसार, डिसेंबर 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये 10.4 टक्क्यांनी वाढला आहे.

शहरात महागाईचा दर डिसेंबर 2020 मध्ये 13.3 टक्क्यांवर रिकॉर्ड झाला. 12 महिन्यात खाण्या-पिण्याच्या दरात 28 टक्के वाढ झाली आहे. डिसेंबर 2019 मध्ये जिथे गावात खाद्य पदार्थांच्या दरात 11.3 टक्के होतं. तर डिसेंबर 2020 मध्ये हा दर 16.2 टक्क्यांवर पोहोचला. गावात खाण्या-पिण्याच्या दरात 43 टक्क्यांची वाढ झाली.

वर्ल्ड बँकेने काय म्हटलं?

वर्ष 2018 मध्ये वर्ल्ड बँकेच्या एका रिपोर्टनुसार, गावांमध्ये शहरांच्या तुलनेत गरिबीत दुप्पट वाढ झाली आहे. गावात गरिबीचा दर 36 टक्क्यांवर पोहोचला. तर शहरात हा आकडा 18 टक्के होता. ग्रामीण भागातून खाण्या-पिण्याच्या गोष्टींची निर्यात होत असते. पण, वाढत्या महागाईने यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत (Pakistan Rural Areas Food Inflation).

गाव आणि शहरामधील अंतर वाढलं

डिसेंबर 2020 मध्ये ग्रामीण आणि शहरी परिसरात खाद्य महागाई दर 2.9 टक्क्यांवर होता. गावात महागाईचा दर 12.6 टक्के होता तर शहरात हा दर 13.3 टक्के होता. वर्ल्ड बँकेनुसार, पाकिस्तानच्या ग्रामीण भागातील 80 टक्के जनता ही गरिबी रेषेखाली राहण्यास मजबूर आहे.

रिपोर्टनुसार, महागाईच्या दराने गावात असलेल्या लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागत आहे. आतापर्यंत पंतप्रधान इमरान खान सरकारकडून आतापर्यंत यासाठी कुठलीही उपाययोजना केलेली नाही.

Pakistan Rural Areas Food Inflation

संबंधित बातम्या :

ना तो फार बोलतो, ना शिकण्यात तेज होता, आता थेट म्यानमारमध्ये तख्तापलट करणाऱ्या जनरलची संपूर्ण कहाणी

‘या’ भीतीमुळे ब्रिटीनच्या राणीकडून 50 वर्षांपूर्वी ‘Royal Family’वरील माहितीपट बॅन, आता लिक…

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...