AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pakistan War Tension : इसे कहते हैं डर, पाकिस्तानमध्ये भिती इतकी की, तिथे शहरा-शहरात अशी सुरु आहे युद्धाची तयारी

Pakistan War Tension : पाकिस्तान सध्या प्रचंड तणावाखाली आहे. कुठून, कधी, कसा हल्ला होईल? ही भिती त्यांच्या मनामध्ये आहे. याच दहशतीमुळे पाकिस्तानच्या वेगवेगळ्या शहरात सध्या अशा पद्धतीने युद्धाची तयारी सुरु आहे. तिथल्या सरकारने काय आदेश दिलेत? ते जाणून घ्या.

Pakistan War Tension : इसे कहते हैं डर, पाकिस्तानमध्ये भिती इतकी की, तिथे शहरा-शहरात अशी सुरु आहे युद्धाची तयारी
| Updated on: May 01, 2025 | 10:07 PM
Share

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानची झोप उडाली आहे. भारताकडून कधीही हल्ला होईल, ही भिती त्यांना सतावत आहे. ते किती दहशतीखाली आहेत, याचा अंदाज यावरुनच येतो की, त्यांनी त्यांची अणवस्त्र आणि फायटर जेट्स लपवून ठेवली आहेत. भारताकडून सर्वप्रथम अणवस्त्र आणि फायटर जेट्सना लक्ष्य केलं जाईल असं त्यांना वाटतं. त्याचवेळी जिन्नाने निर्माण केलेला हा देश युद्धाची तयारी करण्यामध्ये गुंतला आहे. म्हणूनच त्यांनी आपल्या शहरांमध्ये सायरन लावले आहेत. जेणेकरुन, कुठल्याही संभाव्य हल्ल्याआधी जनतेला सर्तक करता येईल.

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा सरकारने पेशावर, अबोटाबाद, मर्दानसह प्रांताच्या 29 शहरात इशारा देणारे सायरन लावण्याचा निर्णय घेतला आहे या सायरनचा उद्देश इमर्जन्सीच्या स्थितीत नागरिकांना सर्तक करणं, त्यांना वॉर्निंग देणं हा आहे. शत्रूच्या हवाई हल्ल्यादरम्यान किंवा कुठल्याही विनाशकारी स्थितीत युद्धाचा इशारा देणारी सायरन प्रणाली महत्त्वाची भूमिका बजावते असं खैबर पख्तूनख्वा सरकारने म्हटलं आहे. “सायरनचा आवाज 10 ते 15 किलोमीटरपर्यंत ऐकू गेला पाहिजे. 10 एचपीचे हे सायरन हूटर इन्स्टॉल करायला सांगितले आहेत” असे खैबर पख्तूनख्वा सरकारने आदेश दिले आहेत.

पाकिस्तानने अमेरिकेसमोर हात पसरले

पाकिस्तानने काल सांगितलं की, त्यांच्याकडे खात्रीलायक माहिती आहे की, भारत लवकरच त्यांच्या विरुद्ध सैन्य कारवाई सुरु करेल. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी अमेरिकेसमोर हात पसरले आहेत. “वक्तव्य कमी करुन जबाबदारीने काम करण्यासाठी भारतावर दबाव टाकावा” अशी विनंती त्यांनी अमेरिकेला केली. 22 एप्रिलला पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी धर्म विचारुन गोळ्या झाडल्या. यात 26 निरपराध पर्यटकांचा मृत्यू झाला. भारताने दोन पाकिस्तानी नागरिकांसह तीन पाकिस्तानी हल्लेखोरांची ओळख पटवली आहे. या सगळ्यामागे पाकिस्तानच आहे. पण सवयीप्रमाणे आपला या सगळ्याशी काहीही संबंध नाही असा कांगावा पाकिस्तान करत आहे.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत