अखेर टॅरिफ वार संपलाच… अमेरिकेत या भारतीय वस्तू होणार थेट स्वस्त शिवाय दुग्धजन्य पदार्थ..

भारत आणि अमेरिकेतील संबंध गेल्या काही दिवसांपासून तणावात बघायला मिळाली. अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ लावल्याने संबंध तणावात आले. अमेरिका एक पाऊस मागे घेत असून भारतावरील टॅरिफ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अखेर टॅरिफ वार संपलाच... अमेरिकेत या भारतीय वस्तू होणार थेट स्वस्त शिवाय दुग्धजन्य पदार्थ..
India-US Trade Agreement
| Updated on: Feb 07, 2026 | 1:46 PM

अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध मागील काही दिवसांपासून तणावात दिसले. आता कुठेतरी नक्कीच या संबंधांमध्ये सुधारणा दिसत आहे. भारतावर अमेरिकेने मोठे टॅरिफ लावला. यादरम्यान भारतानेही अमेरिकेविरोधात भूमिका घेतली. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिका भारतावर निर्बंध लादताना दिसली. भारतानेही यावर थेट निर्णय घेत आपले होणारे नुकसान भरून काढण्यासाठी थेट अनेक देशांसोबत व्यापार करार केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच मोठी घोषणा करत भारतावरील मुळ टॅरिफ 25 टक्क्याहून 18 टक्क्यांवर आणत असल्याचे म्हटले, त्यामध्येच आता मोठी बातमी पुढे आली असून भारतावरील दंडात्मक 25 टक्के टॅरिफ काढण्याच्या आदेशावरही डोनाल्ड ट्रम्प यांनी सही केली. म्हणजेच आता भारतावर फक्त 18 टक्के टॅरिफ असणार आहे. भारत-अमेरिका व्यापार कराराची रूपरेषा जाहीर करून एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकले, नक्कीच अमेरिकेने टाकले.

भारत-अमेरिका करारात विशिष्ट व्यापार वचनबद्धता समाविष्ट आहेत. दोन्ही देशांकडून सांगण्यात आले की, व्यापार करार पूर्ण झाली आहेत आता फक्त तांत्रिक बाबीवर काम सुरू आहे. कोकिंग कोळसा, विमाने, विमानाचं सुटे भाग, तेल, वायू अशा 500 अब्ज डॉलर्सच्या अमेरिकन वस्तू खरेदी करण्याचे भारताने या करारात मान्य केले आहे. अमेरिका देखील यादरम्यान मोठा निर्णय घेत आहे.

भारत-अमेरिका व्यापार करारांतर्गत अमेरिका भारतातून आयात होणाऱ्या जवळपास सर्वच वस्तूंवर 18 टक्के टॅरिफ लावतंय. यामध्ये, चामडे, कपडे, चप्पल, सेंद्रिय खते, प्लास्टिक, हस्तकला याचा समावेश प्रामुख्याने आहे. भारताचे वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर या निर्णयाचे स्वागत केले. भारतीय निर्यातदारांसाठी 30 ट्रिलियन डॉलर्सच्या अमेरिकन बाजारपेठेत प्रवेश मिळेल,

याचा फायदा शेतकरी, मच्छीमार आणि एमएसएमईंला होईल, असे त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले. पियुष गोयल यांनी म्हटले की, मार्चपर्यंत औपचारिक व्यापार करारावर सही होऊ शकते, त्यानंतर भारत अमेरिकन निर्यातीवरील कर कपात लागू करेल. भारत आणि अमेरिकेतील व्यापार करारावर गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. मात्र, आता अखेर व्यापार करार पूर्ण झाली.

दोन्ही देश काही गोष्टींवर राजी झाले आहेत. आपल्या देशातील शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याकरिता भारताने पूर्ण काळजी घेतली आहे. दोन्ही देशातील व्यापार करार सहमती झाल्यानंतर भारतावरील टॅरिफ अमेरिका मागे घेताना दिसत आहे. शिवाय मागील काही दिवसांपासून ताणलेले संबंध आता कुठेही संपत असल्याचेही यावरून स्पष्टपणे दिसत आहे.