AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तालिबान भारताला अधिक महत्त्व देऊ लागल्याने पाकिस्तानमध्ये जळफळाट

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंध तालिबान सत्तेत येण्याआधी पासून चांगले आहेत. तालिबान सत्तेत आल्याने भारताने चिंता व्यक्त केली होती. सध्या अफगाणिस्तानमध्ये तालिबानच राज्य करत असल्याने आता त्याला भारतासोबत संबंध वाढवायचे आहेत.

तालिबान भारताला अधिक महत्त्व देऊ लागल्याने पाकिस्तानमध्ये जळफळाट
afganistan
shailesh musale
shailesh musale | Updated on: Apr 12, 2024 | 8:30 PM
Share

तालिबानने जेव्हा अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन केलं तेव्हा भारताने देखील याबाबत चिंता व्यक्त केली होती. भारताने अफगाणिस्तानमध्ये अनेक प्रकल्प राबवले आहेत त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध चांगले आहेत. जेव्हा तालिबान सत्तेत आलं तेव्हा पाकिस्तान खूप आनंदी होता. तालिबान आल्याने त्याचे भारतासोबत संबंध बिघडतील असे पाकिस्तानला वाटले होते. पण घडले उलटे. तालिबानचे पाकिस्तानसोबतचे संबंध सातत्याने बिघडत आहेत. तालिबानने अफगाणिस्तानात पाकिस्तानच्या चलनावरच बंदी घातली. आता भारताच्या मदतीने तालिबान आपला व्यापार वाढवत आहे.

भारताने बांधलेल्या बंदरातून व्यापार

अफगाणिस्तान आता पाकिस्तानमधून व्यापार करण्याऐवजी भारताने बांधलेल्या इराणच्या चाबहार बंदरातून व्यापार करणार आहे. त्यामुळे पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. पाकिस्तान आणि तालिबान यांच्यातील संबंध बिघडत असताना पाकिस्तानी जनतेने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. यासाठी पाकिस्तानी लोकं पाकिस्तानलाच दोष देत आहेत.

पाकिस्तानी यूट्यूबर सुहैब चौधरी याने पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंधांबाबत पाकिस्तानी लोकांशी चर्चा केली. सुहैबशी बोलताना पाकिस्तानचे वकील एम.ए.खान म्हणाले की, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंध मजबूत आहेत. अफगाणिस्तानातील लोक आम्हाला आवडत नाहीत. सीमेवर अजूनही आपल्यामध्ये धोका आहे. अफगाणिस्तानातून सातत्याने हल्ले होत आहेत. एवढेच नाही तर तालिबान आता भारताला तिथे जागा देत आहे. अफगाणिस्तानला व्यापारात पाकिस्तानचा फायदा होत नाही, त्यामुळे त्यांना भारताशी संबंध वाढवायचे आहेत, असे खान म्हणाले.

अफगाणिस्तान पाकिस्तानवर का नाराज

दुस-या एका व्यक्तीने सांगितले की, संबंध बिघडण्यामागे पाकिस्तानची धोरणे जबाबदार आहेत. इस्लामाबाद अमेरिकेला खूश करत असल्याने अफगाणिस्तान संतप्त आहे. पेट्रोल कुणाकडून घ्यायचे आणि गॅस कुणाकडून घ्यायचे ते अमेरिका सांगते. बांगलादेशला स्वातंत्र्य आपल्यापेक्षा उशिरा मिळाले आणि तो आपल्या पुढे आहे. अफगाणिस्तान आपल्याशी अशी वागणूक देत आहे जसा कोणताही मुस्लीम दुसऱ्या मुस्लिमाशी करत नाही. अफगाणिस्तानचे लोक हिंदूंशी (भारत) हातमिळवणी करून आमच्याशी वैर करत आहेत.

आणखी एका व्यक्तीने सांगितले की, 1947 पासून पाकिस्तानात आलेल्या सर्व राज्यकर्त्यांपैकी कोणीही देशाचा विचार केला नाही. आमच्या एजन्सी अफगाणिस्तानात हस्तक्षेप करतात, त्यामुळेच अफगाणिस्तानचे लोक आमच्यावर नाराज आहेत. अफगाणिस्तानच्या जनतेच्या आमच्याकडून ज्या अपेक्षा होत्या त्या भारत पूर्ण करत आहे. भारत अफगाणिस्तानात धरण बांधत आहे. चांगले शिक्षण देण्यासाठी मदत करत आहे. यामुळेच अफगाणिस्तान भारताशी संबंध पाकिस्तानच्या वर ठेवत आहे.

Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!