AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रशिया-युक्रेन युद्धावर भारत तोडगा काढणार? पाहा काय म्हणाले एस जयशंकर

रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याचा भारताचा प्रयत्न आहे का? परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीच याचे उत्तर दिले आहे. आम्ही आणखी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पीएम नरेंद्र मोदी पुढील महिन्यात युक्रेनच्या दौऱ्यावर जाणार का याबाबत ही त्यांनी संकेत दिले आहेत.

रशिया-युक्रेन युद्धावर भारत तोडगा काढणार? पाहा काय म्हणाले एस जयशंकर
shailesh musale
shailesh musale | Updated on: Jul 30, 2024 | 12:17 AM
Share

रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी भारत प्रयत्न करेल का यावर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संकेत दिले आहेत. एस जयशंकर म्हणाले की, भविष्यात भारत हा युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांसोबत संवाद साधेल. ज्यामुळे दोन्ही बाजूंशी संपर्क साधला जाईल आणि संघर्ष सोडवण्यात मदत होईल. जयशंकर यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात युक्रेनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. याआधी त्यांनी नुकताच रशियाला भेट दिली होती. जिथे त्यांची राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत भेट झाली होती.

एस जयशंकर म्हणाले की, संघर्षावर तोडगा युद्धभूमीतून येणार नाही ही भारताची भूमिका आहे. परिस्थिती आहे तशीच सोडून देणे आणि इतर घटना घडण्याची वाट पाहणे हा चुकीचा निर्णय आहे. संकट संपवण्यासाठी आपल्याला पावले उचलावी लागतील. जपानच्या नॅशनल प्रेस क्लबमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान जयशंकर म्हणाले की, “आम्ही तिथे अधिक सक्रिय व्हायला हवे, असा आमचा विश्वास आहे.”

मोदी युक्रेनला जाणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात युक्रेनला भेट देणार का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर एस जयशंकर म्हणाले, मी आशा करू शकतो की आमचे दोन्ही देशांसोबत संपर्क असेल. परराष्ट्र मंत्र्यांनी मात्र ते पूर्णपणे स्पष्ट केले नाही.  ते म्हणाले की, कोणत्याही सरकारप्रमाणे आम्हीही योग्य वेळी योग्य आमची भूमिका स्पष्ट करु. आम्हाला विश्वास आहे की युक्रेन-रशिया संघर्ष संपवण्यासाठी आणखी काही करणे आवश्यक आहे.

एस जयशंकर म्हणाले की, आमचा विश्वास आहे की युक्रेनचे संकट थांबवण्यासाठी आणखी काम करण्याची गरज आहे. जगाच्या इतर भागांत घडणाऱ्या घटनांप्रमाणेच यावरही उपाय शोधण्याचा आपण त्वरित प्रयत्न केला पाहिजे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन भारत रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांच्या संपर्कात आहे. कारण अनेक देश दोन्ही बाजूंशी बोलत नाहीत. दोन्ही देश युद्धभूमी सोडून वाटाघाटीच्या टेबलावर यावेत, यासाठी आम्ही जे काही करू शकतो ते करू.

Follow Us
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा; ऑपरेशन टायगर पुन्हा अॅक्टिव्ह!
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना अटक
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण...
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण... अमोल कोल्हेंचं मोठं विधान; चर्चांना मिळाला पूर्णविराम!
मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट
Rain Alert | मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट मोडवर
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल;
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल; पक्षातील...
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्य
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप?
ऑपरेशन कमळ होणारच!; संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा, राजकारण तापलं
Sanjay Raut | ऑपरेशन कमळ होणारच!; संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा, राजकारण तापलं
थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
Vijay Thalapathy | थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान धक्कादायक घटना