AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रशिया-युक्रेन युद्धावर भारत तोडगा काढणार? पाहा काय म्हणाले एस जयशंकर

रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याचा भारताचा प्रयत्न आहे का? परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीच याचे उत्तर दिले आहे. आम्ही आणखी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पीएम नरेंद्र मोदी पुढील महिन्यात युक्रेनच्या दौऱ्यावर जाणार का याबाबत ही त्यांनी संकेत दिले आहेत.

रशिया-युक्रेन युद्धावर भारत तोडगा काढणार? पाहा काय म्हणाले एस जयशंकर
| Updated on: Jul 30, 2024 | 12:17 AM
Share

रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी भारत प्रयत्न करेल का यावर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संकेत दिले आहेत. एस जयशंकर म्हणाले की, भविष्यात भारत हा युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांसोबत संवाद साधेल. ज्यामुळे दोन्ही बाजूंशी संपर्क साधला जाईल आणि संघर्ष सोडवण्यात मदत होईल. जयशंकर यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात युक्रेनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. याआधी त्यांनी नुकताच रशियाला भेट दिली होती. जिथे त्यांची राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत भेट झाली होती.

एस जयशंकर म्हणाले की, संघर्षावर तोडगा युद्धभूमीतून येणार नाही ही भारताची भूमिका आहे. परिस्थिती आहे तशीच सोडून देणे आणि इतर घटना घडण्याची वाट पाहणे हा चुकीचा निर्णय आहे. संकट संपवण्यासाठी आपल्याला पावले उचलावी लागतील. जपानच्या नॅशनल प्रेस क्लबमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान जयशंकर म्हणाले की, “आम्ही तिथे अधिक सक्रिय व्हायला हवे, असा आमचा विश्वास आहे.”

मोदी युक्रेनला जाणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात युक्रेनला भेट देणार का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर एस जयशंकर म्हणाले, मी आशा करू शकतो की आमचे दोन्ही देशांसोबत संपर्क असेल. परराष्ट्र मंत्र्यांनी मात्र ते पूर्णपणे स्पष्ट केले नाही.  ते म्हणाले की, कोणत्याही सरकारप्रमाणे आम्हीही योग्य वेळी योग्य आमची भूमिका स्पष्ट करु. आम्हाला विश्वास आहे की युक्रेन-रशिया संघर्ष संपवण्यासाठी आणखी काही करणे आवश्यक आहे.

एस जयशंकर म्हणाले की, आमचा विश्वास आहे की युक्रेनचे संकट थांबवण्यासाठी आणखी काम करण्याची गरज आहे. जगाच्या इतर भागांत घडणाऱ्या घटनांप्रमाणेच यावरही उपाय शोधण्याचा आपण त्वरित प्रयत्न केला पाहिजे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन भारत रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांच्या संपर्कात आहे. कारण अनेक देश दोन्ही बाजूंशी बोलत नाहीत. दोन्ही देश युद्धभूमी सोडून वाटाघाटीच्या टेबलावर यावेत, यासाठी आम्ही जे काही करू शकतो ते करू.

Follow Us
जे भोंदूबाबाला शरण गेले त्या सर्वांनीच राजीनामा द्यावा - यशोमती ठाकूर
जे भोंदूबाबाला शरण गेले त्या सर्वांनीच राजीनामा द्यावा - यशोमती ठाकूर.
भोंदूबाबा खरातचा पीए नीरज जाधव कोर्टात हजर होणार? आणखी बाहेर पडणार?
भोंदूबाबा खरातचा पीए नीरज जाधव कोर्टात हजर होणार? आणखी बाहेर पडणार?.
...तर तटकरे आणि प्रभृतींनी अजितदादांचा वारसा सांगू नये - सुषमा अंधारे
...तर तटकरे आणि प्रभृतींनी अजितदादांचा वारसा सांगू नये - सुषमा अंधारे.
'भोंदूबाबाचा ट्रायडंटवरुन मंत्र्यांना आदेश...,' संजय राऊत यांचा आरोप
'भोंदूबाबाचा ट्रायडंटवरुन मंत्र्यांना आदेश...,' संजय राऊत यांचा आरोप.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदी आता IPS नेमा, अंजली दमानिया यांची मागणी
महिला आयोगाच्या अध्यक्षपदी आता IPS नेमा, अंजली दमानिया यांची मागणी.
पुणे पुन्हा हादरलं! त्या बॅनरवरून वाद; दोन गटांमध्ये गोळीबार
पुणे पुन्हा हादरलं! त्या बॅनरवरून वाद; दोन गटांमध्ये गोळीबार.
हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं पीक मातीमोल, शेतकऱ्यांना लाखोंचा फटका
हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं पीक मातीमोल, शेतकऱ्यांना लाखोंचा फटका.
सांगलीत अवकाळीचा हाहाकार, काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान
सांगलीत अवकाळीचा हाहाकार, काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; भरपाईची मागणी
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; भरपाईची मागणी.
भोंदूबाबा प्रकरणात रुपाली चाकणकर गोत्यात; तटकरे यांची प्रतिक्रिया काय?
भोंदूबाबा प्रकरणात रुपाली चाकणकर गोत्यात; तटकरे यांची प्रतिक्रिया काय?.