AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातला एकमेव देश जो कधीच कुणाचा गुलाम नाही राहिला, भारताचा आहे शेजारी

आज आम्ही तुम्हाला एका अशा देशाबद्दल सांगणार आहोत जो कधीही कुणाचा गुलाम राहिलेला नाही. जगातील तो एकमेव देश आहे. हा भारताचा शेजारील छोटासा देश कधीच कोणाला शरण देला नाही. या देशावर हल्ले झाले पण कोणालाच त्याला गुलाम करण्यात यश मिळाले नाही. कोणता आहे तो देश जाणून घ्या.

जगातला एकमेव देश जो कधीच कुणाचा गुलाम नाही राहिला, भारताचा आहे शेजारी
| Updated on: Nov 02, 2024 | 8:57 PM
Share

जगात असे अनेक देश आहेत जे एकेकाळी कुणाचे तरी गुलाम राहिले आहेत. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, भारताचा शेजारी देश नेपाळ हा इतिहासात कधीही कोणाचा गुलाम झाला नाही. अनेक आक्रमणकर्त्यांनी वेगवेगळ्या देशांवर आक्रमण केले, गाव लुटली. भारताचा इतिहास पाहिला तरी हे लक्षात येते की इंग्रजांनी भारतावर दोन शतके राज्य केले. पण तुम्हालाही प्रश्न असा पडला असेल की, नेपाळवर कोणी राज्य का केले नाही?

व्यापाराचे प्रमुख केंद्र

नेपाळ हा तिबेट, भारत आणि चीन यांच्यातील व्यापाराचे प्रमुख केंद्र होते. सर्व व्यापार याच मार्गाने होत होते. त्याची भौगोलिक स्थिती अशी आहे की इथपर्यंत पोहोचणे फार कठीण होते. हिमालयातील टेकड्या आणि घनदाट जंगले कोणत्याही आक्रमणकर्त्यासाठी एक मोठा अडथळा होता. तसेच नेपाळी लोक नेहमीच शूर योद्धा राहिले आहेत. गोरखा सैनिकांचे शौर्य जगभर प्रसिद्ध आहे. अनेक युद्धांमध्ये त्यांनी आपले सामर्थ्य दाखवून दिले आहे. इंग्रजांशी झालेल्या युद्धातही गोरखा सैनिक अतिशय शौर्याने लढले होते.

कोणी-कोणी केले हल्ले

मुस्लीम राज्यकर्त्यांनी अनेकवर नेपाळवर हल्ले केले, पण त्यात त्यांना यश आले नाही. शमसुद्दीन इलियास शाह आणि मीर कासिम यांनी नेपाळवर हल्ला केला होता, पण गोरखा सैन्याने त्यांचा पराभव करून त्यांना परत पाठवले होते.

इंग्रजांनी देखील नेपाळवर राज्य करण्याचाही प्रयत्न केला. 1814 ते 1816 या काळात ब्रिटीश आणि नेपाळमध्ये युद्ध झाले, ज्याला गोरखा युद्ध म्हणतात. या युद्धानंतरच सुगौलीचा तह झाला, त्यानुसार नेपाळने कुमाऊं आणि गढवाल भाग इंग्रजांच्या स्वाधीन केले आणि इंग्रजांनी पुन्हा नेपाळवर हल्ला न करण्याचे वचन दिले.

नेपाळचा इतिहास हा त्या देशाचा इतिहास आहे ज्याने आपले स्वातंत्र्य जपले. नेपाळची ही कथा आपल्याला सांगते की कोणत्याही देशाचे स्वातंत्र्य वाचवण्यासाठी तेथील लोकांची एकता आणि शौर्य खूप महत्त्वाचे असते.

पंतप्रधान मोदींनी सुनेत्रा पवारांना दिलेल्या शुभेच्छांवर राऊतांची टीका
पंतप्रधान मोदींनी सुनेत्रा पवारांना दिलेल्या शुभेच्छांवर राऊतांची टीका.
सुनेत्रावहिनींचा निर्णय कौतुकास्पद, धाडसी! फडणवीसांकडून ट्विट
सुनेत्रावहिनींचा निर्णय कौतुकास्पद, धाडसी! फडणवीसांकडून ट्विट.
दादांच्या अकाली जाण्याने मनावर दु:खाचा डोंगर; सुनेत्रा पवारांचं ट्विट
दादांच्या अकाली जाण्याने मनावर दु:खाचा डोंगर; सुनेत्रा पवारांचं ट्विट.
राष्ट्रवादीचा अध्यक्ष पाटील असावा पटेल नाही! राज ठाकरेंचं ट्विट
राष्ट्रवादीचा अध्यक्ष पाटील असावा पटेल नाही! राज ठाकरेंचं ट्विट.
सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी
सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी.
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना.
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल.
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी.
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?.