पाण्याने भरलेल्या विहिरीत आढळल्या तब्बल 11 चोरीच्या बाईक

| Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात एकूण 11 बाईक पाण्याने भरलेल्या विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ परिसरात उडाली आहे. जिल्ह्यातील कळस गावातल हा बाईक चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी बाईकचे पार्ट्स काढून या बाईक विहिरीत फेकल्याचं बोललं जात आहे. विहिरीतील 11 बाईक पोलिसांनी हस्तगत केल्या असून विहिरीत आणखी मोटारसायकल असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता या […]

पाण्याने भरलेल्या विहिरीत आढळल्या तब्बल 11 चोरीच्या बाईक
Follow us on

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात एकूण 11 बाईक पाण्याने भरलेल्या विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ परिसरात उडाली आहे. जिल्ह्यातील कळस गावातल हा बाईक चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी बाईकचे पार्ट्स काढून या बाईक विहिरीत फेकल्याचं बोललं जात आहे. विहिरीतील 11 बाईक पोलिसांनी हस्तगत केल्या असून विहिरीत आणखी मोटारसायकल असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता या बाईक चोर टोळीचा छडा लावण्याचं आव्हान पोलिसांवर उभं राहिलं आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

अकोले तालुक्यातील कळस गावातील ही घटना आहे. गावातील प्रवरा नदीच्या जवळ असणा-या पिण्याच्या पाण्याच्या जुन्या विहिरीत ऑईलचा तवंग आल्याचं पाहून नागरीकांनी पोलीसांना याबाबतची माहिती दिली. पोलीस आल्यानंतर विहिरीत गळ टाकला असता त्यातून बाईक निघाली. हे पाहून गावकरीही थक्क झाले आहेत. विशेष म्हणजे अशा एक ना दोन आत्तापर्यंत जवळपास अकरा बाईक विहिरीतून बाहेर काढल्या आहेत. विहिरीत पाणी जास्त असल्याने आता सक्शन पंप लावून पाणी बाहेर काढले जाणार आहे. त्यानंतर आणखी किती बाईक या विहिरीत आहे याची माहीती मिळू शकेल.

आत्तापर्यंत निघालेल्या या बाईक दिड दोन वर्षापूर्वी अकोले आणि संगमनेर तालुक्यातून चोरीला गेल्या होत्या. चोरांनी या गाड्यांचे काही पार्टस काढून घेतल्याच्या अवस्थेत असून बाईक विहिरीत टाकून दिल्या असल्याचा संशय पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. परिसरातील आणखी काही विहिरीत गाड्या आहे की काय याचा पोलीस शोध घेत आहेत. मात्र अशा प्रकारे गाड्या चोरून विहिरीत का टाकून दिल्या? हा प्रश्न पोलिंसासमोर निर्माण झाला आहे. या बाईक चोरट्यांना पकडण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.

यावेळी संगमनेर, अकोले या भागातील अनेकांनी ज्यांची गाडी चोरीला गेली त्यांनी विहिरीजवळ गर्दी केली होती. विहिरीतून निघालेल्या गाड्यांपैकी आपली गाडी आहे का याची खातरजमा करत आहेत.