AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cyclone Nisarga | निसर्ग चक्रीवादळात 7 जणांचा जीव वाचवणारी खिडकी!

निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा दापोली तालुक्यातील हर्णे आणि पाज पांढरी या गावांना बसला आहे. (Ratnagiri Harne village cyclone)

Cyclone Nisarga | निसर्ग चक्रीवादळात 7 जणांचा जीव वाचवणारी खिडकी!
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jun 04, 2020 | 8:09 PM
Share

रत्नागिरी : विध्वंस करुन निसर्ग चक्रीवादळ आता विसावलं आहे. कोकणात लाखो झाडं उन्मळून पडलेत. (Ratnagiri Harne village cyclone) अनेक घरं कोसळली आहेत. निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा दापोली तालुक्यातील हर्णे आणि पाज पांढरी या गावांना बसला आहे. या दोन्ही गावातील 95 टक्के घरांचं मोठं नुकसान झालं आहे. जरी जीवितहानी झाली नसली तरी प्रत्येक घरातील काही ना काही नुकसान झालं आहे. कुणाचं छप्पर उडालं, कुणाची भिंत पडली, कुणाची दारं निखळली, कुणाच्या घरात पाणी शिरलं. (Ratnagiri Harne village cyclone)

या दोन गावात क्वचितच असं घर आहे, ज्याला वादळाचा तडाखा बसलेला नाही. काहींचं तर आता संपूर्ण घरच उद्ध्वस्त झालं आहे. त्यामुळे आता जगण्याचा प्रश्न त्यांच्यासमोर आवासून उभा आहे.

अशा परिस्थितीत या गावातील आख्खं कुटुंब एका खिडकीमुळे बचावलं. सोसाट्याचा वारा आणि पाऊस अशा परिस्थिती चक्रीवादळ घरात शिरलं आणि छप्पर उडून गेलं. प्रचंड वाऱ्याने घराचा आडोसा कोसळल्यामुळे कुटुंबातील सात जणांचा जीव अक्षरश: टांगणीला लागला. तीन महिला, लहान बाळ यांच्यासह घरातील सर्वजण एका भिंतीच्या आडोशाला उभे होते. मात्र सोसाट्याच्या वाऱ्याने विध्वंस सुरु केल्याने, नेमकं जायचं कुठं, आणि आधार कशाचा घ्यायचा असा प्रश्न या कुटुंबाला होता.

अशावेळी घराच्या मागे असलेल्या स्नानगृहात अर्थात बाथरुममध्ये जाऊन आडोसा शोधण्याचा निर्णय घरातील पुरुषांनी घेतला. मात्र बाथरुमपर्यंत जायचं कसं, हा प्रश्न होता. पडझडीने दरवाजे बंद झाले. अशावेळी घराची खिडकी या कुटुंबासाठी जीवनाचा मार्ग ठरली.

“वारा, पाऊस आला तेव्हा आम्ही सर्वजण सहा-सातजण या भिंतीच्या कडेला उभे होतो. काही सूचत नव्हतं. कसं बाहेर पडायचं हे कळत नव्हतं. दरवाजे बंद होते, त्यावेळी आमच्यासमोर एकच पर्याय खिडकीचा होता. त्या खिडकीतून बाळाला पलिकडे घेतलं. मग बायको, मावशी, आत्या यांच्यासह अन्य सदस्य एक-एक करुन खिडकीतून बाहेर आले आणि बाथरुममध्ये सर्वांना ठेवलं. आई जेव्हा खिडकीतून बाहेर येत होती, तेव्हा एक सेकंदही उशीर झाला असता, तर माझी आई आज मला दिसली नसती. कारण आईला बाहेर काढताच, घराचं छप्पर पूर्णपणे कोसळलं आणि त्या दरम्यानच आम्ही खिडकीतून बाहेर पडलो” असं या कुटुंबातील सदस्याने सांगितलं.

(Ratnagiri Harne village cyclone)

Follow Us
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?.

उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही...

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही..

मी काय सहन केलं, काय गमावलं..; आणखी एका मराठी अभिनेत्रीला कॅन्सर, पोस्ट लिहित खुलासा.

मी काय सहन केलं, काय गमावलं..; आणखी एका मराठी अभिनेत्रीला कॅन्सर, पोस्ट लिहित खुलासा

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस