AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : तुमच्याही घरात असतील या वस्तू तर घरात कधीच टिकणार नाही पैसा, वास्तुशास्त्र काय सांगतं?

वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी असतात, ज्यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो. घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास पैसा टिकत नाही. काहीही कारण नसताना घरात सतत वादविवाद होऊ शकतात. आज आपण वास्तुदोष कसा दूर? करायचा आणि कोणत्या गोष्टींमुळे तो निर्माण होऊ शकतो? याची माहिती जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : तुमच्याही घरात असतील या वस्तू तर घरात कधीच टिकणार नाही पैसा, वास्तुशास्त्र काय सांगतं?
vastushtra Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 05, 2026 | 6:59 PM
Share

वास्तुशास्त्राला हिंदू धर्मशास्त्रामध्ये महत्त्वाचं स्थान आहे. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा सगळं सुरळीत सुरू असताना देखील तुमच्या आयुष्यात अचानक काही अडचणी येण्यास सुरुवात होते. जसं की घरात काहीही कारण नसताना कुटुंब प्रमुखाचं घरातील इतर सदस्यांसोबत भांडणं होतं. पती-पत्नीमध्ये सतत वाद होत राहतात. पती-पत्नीचं पटत नाही. कधी-कधी तर परिस्थिती एवढी बिकट बनते की गोष्ट थेट घटस्फोटापर्यंत देखील जाऊ शकते. एवढंच नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास तुमच्या आयुष्यात काही मोठे आर्थिक संकट देखील येऊ शकतात, त्यामुळे घरातील वास्तुदोष दूर करणं गरजेचं आहे. आता तुम्हाला असा प्रश्न देखील पडला असेल की घरात वास्तुदोष कशामुळे निर्माण होतो. तर घरात वास्तुदोष निर्माण होण्यास अनेक कारणं कारणीभूत असतात. मात्र अशा काही वस्तू असतात, ज्या तुम्ही तुमच्या घरात ठेवता कामा नये, कारण अशा गोष्टींमुळे देखील तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो.या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत? आणि वास्तुशास्त्र त्याबद्दल काय सांगतं? याबद्दल जाणून घेऊयात.

घराची उत्तर दिशा – वास्तुशास्त्रानुसार घराची उत्तर दिशा ही नेहमी स्वच्छ आणि मोकळी असावी, याचाच अर्थ या दिशेला कुठल्याही प्रकारची अडचण नसावी. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे उत्तर दिशा ही धनाची देवता कुबेर यांची अत्यंत प्रिय दिशा आहे. त्यामुळे या दिशेला कोणताही अडथळा निर्माण होता कामा नये, त्यासाठी घराच्या उत्तर दिशेला रद्दी, अवजड आणि लोखंडी सामान ठेवू नये, तसेच उत्तर दिशेच्या भिंतीला कुबेराचा एक फोटो देखील असावा, असं वास्तुशास्त्र सांगतं.

युद्धाचे प्रसंग असलेले फोटो, मूर्ती – तसेच वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरात युद्धाचे प्रसंग असलेल्या मुर्ती किंवा फोटो असतील तर अशा मूर्ती, प्रतिमा घरात ठेवणं हे अशुभ मानलं जातं. कारण यामुळे घरात गृहकलह वाढतात, त्याचबरोबर तुम्हाला आर्थिक नुकसान देखील होऊ शकतं, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...