AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अलमट्टीतून पाणी सोडल्याने 17 गावं विस्थापित, पुराचा आरोप महाराष्ट्रावर

कोल्हापूर आणि सांगलीतील पूरस्थिती कमी करण्यासाठी अलमट्टीतून विसर्ग वाढवण्याची मागणी राज्य सरकारने लावून धरली होती. अखेर हा विसर्ग वाढवण्यात आल्याने नदीतील फुगवटा कमी झालाय.

अलमट्टीतून पाणी सोडल्याने 17 गावं विस्थापित, पुराचा आरोप महाराष्ट्रावर
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Aug 13, 2019 | 8:36 PM
Share

बेळगाव : कृष्णा नदीतील फुगवटा कमी करण्यासाठी कर्नाटकातील अलमट्टी धरणातून (Almatti dam) 5 लाख 70 हजार 991 क्युसेक्सने विसर्ग करण्यात येतोय. यामुळे धरणाखालील (Almatti dam) गावं प्रभावित झाली आहेत. ही गावं आता पूरस्थितीसाठी महाराष्ट्राला दोष देत आहेत. कोल्हापूर आणि सांगलीतील पूरस्थिती कमी करण्यासाठी अलमट्टीतून विसर्ग वाढवण्याची मागणी राज्य सरकारने लावून धरली होती. अखेर हा विसर्ग वाढवण्यात आल्याने नदीतील फुगवटा कमी झालाय.

अलमट्टी धरणाच्या निर्मितीनंतर पहिल्यादांच विक्रमी असा पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. मात्र धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे बागलकोट तालुक्यातील मुधोर, यलगुर, मसुतीसह 17 गावात पाणी घुसलंय, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. 17 गावातील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आलं आहे. या गावकऱ्यांनी पुरासाठी महाराष्ट्र सरकारला जबाबदार धरलंय. पाणी सोडण्याची पूर्वकल्पना दिली असती तर आमच्यावर विस्थापित होण्याची वेळ आली नसती, असं या गावकऱ्यांचं म्हणणं आहे.

क्युसेक म्हणजे काय? What is cusec?

नदी, कालव्यातील पाण्याचा प्रवाह (विसर्ग) Cubic feet per second (CuSec) मध्ये मोजला जातो. 1 क्युसेक म्हणजे अंदाजे 28.3 लिटर पाणी. अलमट्टी धरणातून 570991 लाख क्युसेक पाणी सोडलं म्हणजे एका सेकंदाला 1 कोटी 61 लाख 59 हजार 35 लिटर पाणी सोडलेलं असतं.

कसं आहे अलमट्टी धरण?

कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील बसवाना बागेवाडीमध्ये कृष्णा नदीवर हे धरण आहे. धरणाची उंची वाढण्याचा वादही चांगलाच गाजला होता. 147 गावांची 48 हजार हेक्टर जमीन संपादित करुन या धरणाचं काम करण्यात आलं. 2002 मध्ये धरणाचं काम थांबवावं लागलं. अखेर धरण 2005 मध्ये वापरात आलं. या धरणाची लांबी 1564 मीटर आणि उंची 49.29 मीटर आहे. या धरणाची क्षमता जास्त असली तरी सध्या 110 टीएमसीपर्यंतच पाणी साठवलं जातं. धरणाची पूर्ण संचयपातळी 519.60 मीटर आहे. अलमट्टीला दोन कालवेही आहेत. उजव्या कालव्याचं लाभक्षेत्र 20 हजार 235 हेक्टर, तर डाव्या कालव्याचं लाभक्षेत्र 16 हजार 100 हेक्टर आहे.

Follow Us
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...युद्धाचा मोठा फटका!
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं
कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने
कौटुंबिक छळाचा आणखी एक बळी! सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय महिलेने उचलले टोकाचे पाऊल
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... संजय
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... बापरे! संजय राऊत हे काय बोलून गेले? थेट सोने तस्करीशी कनेक्शन!
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण अन् तरुणी
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण आणि त्याची मैत्रीण... नेमकं काय घडलं?