AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान कार्यालयात प्रवेश करताच मोदींचा पहिला निर्णय पोलिसांसाठी

नवी दिल्ली : पहिल्याच कॅबिनेट बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात पहिला निर्णय पोलिसांसाठी घेतलाय. नक्षलवादी किंवा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या मुला-मुलींना दरमहिन्याला पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेतून शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. आतापर्यंत ही शिष्यवृत्ती फक्त सैन्यातील निवृत्त अधिकाऱ्यांच्या मुलांनाच मिळत होती. पण शहीद पोलिसांच्या मुलांनाही याचा फायदा होणार आहे. मोदींनी प्रचारादरम्यान मुंबईतल्या सभेत […]

पंतप्रधान कार्यालयात प्रवेश करताच मोदींचा पहिला निर्णय पोलिसांसाठी
| Edited By: | Updated on: May 31, 2019 | 6:15 PM
Share

नवी दिल्ली : पहिल्याच कॅबिनेट बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात पहिला निर्णय पोलिसांसाठी घेतलाय. नक्षलवादी किंवा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या मुला-मुलींना दरमहिन्याला पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेतून शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. आतापर्यंत ही शिष्यवृत्ती फक्त सैन्यातील निवृत्त अधिकाऱ्यांच्या मुलांनाच मिळत होती. पण शहीद पोलिसांच्या मुलांनाही याचा फायदा होणार आहे.

मोदींनी प्रचारादरम्यान मुंबईतल्या सभेत पोलिसांविषयी सहानुभूतीपूर्वक अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. आतापर्यंत हजारो पोलिसांनी संरक्षण करताना स्वतःचं बलिदान दिलंय, पण त्यांच्या कुटुंबीयांकडे कुणीही पाहिलं नाही, असं ते म्हणाले होते. पहिल्याच कॅबिनेटमध्ये पोलिसांच्या मुलांसाठी हा निर्णय घेत शहिदांच्या कुटुंबीयांना मोठा आधार दिलाय.

काय आहे पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना?

राष्ट्रीय संरक्षण निधीतून माजी लष्करी अधिकाऱ्यांच्या मुलांना दरमहिन्याला उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीच्या रकमेमध्येही आता वाढ करण्यात आली आहे. मुलांसाठी ही रक्कम 2000 रुपयांवरुन 2500, तर मुलींसाठी 2250 रुपयांवरुन 3000 प्रति महिना एवढी करण्यात आली आहे. दरवर्षी शहीद पोलिसांच्या 500 मुलांना योजनेचा लाभ होईल. प्रत्येक वर्षासाठी 500 एवढी मर्यादा ठेवण्यात आली आहे.

आतार्यंत या योजनेचा लाभ फक्त निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांच्या मुलांसाठीच मर्यादित होता. पण कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या पोलिसांच्या मुलांना पहिल्यांदाच या योजनेचा लाभ होईल. वाढ केलेली रक्कमही योजनेसाठी पात्र मुलांना मिळणार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण घेण्यासाठी या शिष्यवृत्तीने आतापर्यंत लाखो मुलांना मदत केली आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.