एअर स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी ठार? अमित शाहांनी आकडा सांगितला

| Updated on: Jul 05, 2019 | 4:21 PM

अहमदाबादा: जम्मू काश्मीरमधील पुलवामा इथं 14 फेब्रुवारीला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. यानंतर भारताने पुलवामाचा बदला म्हणून 26 फेब्रुवारीला पहाटे पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअरस्ट्राईक केला. वायूदलाच्या या हल्ल्यात पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानी सीमेवरील जवळपास 300 ते 350 दहशतवादी ठार झाल्याचं वृत्त आलं. मात्र सैन्यदलाने किंवा सरकारने दहशतवाद्यांच्या मृत्यूचा आकडा जाहीर केला नाही. […]

एअर स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी ठार? अमित शाहांनी आकडा सांगितला
Follow us on

अहमदाबादा: जम्मू काश्मीरमधील पुलवामा इथं 14 फेब्रुवारीला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. यानंतर भारताने पुलवामाचा बदला म्हणून 26 फेब्रुवारीला पहाटे पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअरस्ट्राईक केला. वायूदलाच्या या हल्ल्यात पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानी सीमेवरील जवळपास 300 ते 350 दहशतवादी ठार झाल्याचं वृत्त आलं. मात्र सैन्यदलाने किंवा सरकारने दहशतवाद्यांच्या मृत्यूचा आकडा जाहीर केला नाही. त्यामुळे विरोधक सातत्याने मोदी सरकारला घेरत, ठार झालेल्या दहशतवाद्यांचा आकडा सांगा अशी विचारणा करत आहेत.

अशी मागणी होत असताना आता भाजाप अध्यक्ष अमित शाह यांनी याबाबतचं उत्तर दिलं आहे. अमित शाह यांनी रविवारी 3 मार्च 2019 रोजी गुजरातमधील अहमदाबादेत झालेल्या भाजपच्या सभेत ठार झालेल्या दहशतवाद्यांचा आकडा सांगितला. अमित शाह म्हणाले, “पुलवामा हल्ल्यानंतर प्रत्येक जण विचार करत होता की आणखी एक सर्जिकल स्ट्राईक केला जाऊ शकत नाही का? त्याचवेळी मोदी सरकारने 13 दिवसांनी एअर स्ट्राईक केला, ज्यामध्ये 250 पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले”

भारताने 2016 मध्ये सर्जिकल स्ट्राईक केला. त्यानंतर आता 26 फेब्रुवारीला पुन्हा स्ट्राईक केल्याने, विरोधकांना ही गोष्ट पचनी पडत नाही, असा टोला अमित शाह यांनी लगावला.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी एअर स्ट्राईकचे पुरावे मागत आहेत, तर राहुल बाबा या कारवाईला राजकीय चष्म्यातून पाहात आहेत. दुसरीकडे अखिलेश यादव चौकशीची मागणी करत आहेत. अशा पद्धतीचं वक्तव्ये देशासाठी लाजिरवाणी आहेत, पाकिस्तानला अशा विधानांनी बळ मिळत आहे, असा हल्लाबोल अमित शाहांनी केला.

यावेळी अमित शाहांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावरही निशाणा साधला. आपल्या देशात मौनी बाबांचं सरकार होतं, त्यावेळी सैनिकांचं शीर धडावेगळं केलं जात होतं, मात्र आता आमचे सैनिक F16 विमान पाडतातही आणि पाकिस्तानातून परतही येतात, असं अमित शाह म्हणाले.