AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भुसावळमध्ये नगरसेवकाच्या कुटुंबावर बेछुट गोळीबार, तिघांचा मृत्यू

जळगावमधील भुसावळ येथे नगरसेवक रविंद्र उर्फ हंप्या खरात यांच्या कुटुंबावर (Attack on Family of Corporator Jalgaon) हल्ला झाला आहे.

भुसावळमध्ये नगरसेवकाच्या कुटुंबावर बेछुट गोळीबार, तिघांचा मृत्यू
| Edited By: | Updated on: Oct 07, 2019 | 8:02 AM
Share

जळगाव : जळगावमधील भुसावळ येथे नगरसेवक रविंद्र उर्फ हंप्या खरात यांच्या कुटुंबावर (Attack on Family of Corporator Jalgaon) हल्ला झाला आहे. अज्ञातांनी केलेल्या बेछुट गोळीबारात खरात कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भुसावळ परिसरात दहशतीचे वातावरण (Terror in Bhusaval Jalgaon) तयार झाले आहे.

नगरसेवक रविंद्र खरात यांच्या कुटुंबावरील या हल्ल्याने जळगावमधील पोलीस यंत्रणेच्या कामावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नसल्यानेच त्यांची थेट कुटुंबावर गोळीबार करण्याची मजल गेल्याचं बोललं जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मात्र, अद्याप गुन्हेगारांबाबत काहीही ठोस माहिती मिळू शकलेली नाही.

पोलिसांनी लवकरात लवकर गुन्हेगारांना जेरबंद करण्यात येईल, असं सांगितलं. या हल्ल्यामागील नेमकं कारण काय आहे याबाबतही कोणतीही माहिती नाही. हा हल्ला नेमका वैयक्तिक वादातून होता की यामागे इतर काही राजकीय, व्यावसायिक कारणे होती हे तपासाअंतीच स्पष्ट होणार आहे.

Follow Us
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?.
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!.
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन.