AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऊस शेतकऱ्यांची फसवणूक झाली तर साखरेचा एक कणही कारखान्यातून बाहेर पडू देणार नाही; राजू शेट्टींचा इशारा

केंद्र सरकारने इंधन आणि साखरेच्या दरांत वाढ केली आहे. त्यामुळे आमची मागणी चुकीची नाही. | Raju Shetty

ऊस शेतकऱ्यांची फसवणूक झाली तर साखरेचा एक कणही कारखान्यातून बाहेर पडू देणार नाही; राजू शेट्टींचा इशारा
| Updated on: Nov 02, 2020 | 7:20 PM
Share

कोल्हापूर: केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक केली तर साखरेचा एक कणही कारखान्यांतून बाहेर पडू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला. ऊसतोड मजुरांना 14 टक्के वाढीव मजुरी मिळाली त्याप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही 14 टक्के वाढीव एफआरपी द्यावा. केंद्र सरकारने इंधन आणि साखरेच्या दरांत वाढ केली आहे. त्यामुळे आमची मागणी चुकीची नाही, असे राजू शेट्टी यांनी सांगितले. (Raju Shetty demand to give 14 percent extra FRP to sugercane farmers)

कोल्हापुरात सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या 19व्या ऊस परिषदेत राजू शेट्टी बोलत होते. यावेळी त्यांनी ऊस उत्पादकांना 14 टक्के वाढीव एफआरपी देण्याच्या मागणीवर ठाम असल्याचे सांगितले. गेल्यावर्षीच्या तुलनेत केंद्र सरकारने एफआरपी 100 रूपयांनी वाढवला आहे. परंतु, 14 टक्क्यानुसार एफआरपीची रक्कम 382 रुपयांनी वाढली पाहिजे. त्यामुळे केंद्र सरकारने किमान 200 रुपयांनी तरी एफआरपी वाढवावा.

याबाबतीत केंद्र सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली तर कारखान्यांमधून साखरेचा एक कणही बाहेर पडू देणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. तसेच यंदा शेतकऱ्यांना एफआरपी एकरकमी मिळावा. ज्या साखर कारखान्यांनी गेल्यावर्षीचा एफआरपी अजून दिलेला नाही त्यांचे कारखाने सुरु होऊ देणार नाही, असेही राजू शेट्टी यांनी सांगितले.

यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसाच्या एफआरपीसंदर्भात कोल्हापुरातील साखर कारखानदारांंशीही चर्चा केली होती. मात्र, ही बैठक निष्फळ ठरली होती. यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बैठकीतून निघून गेले. त्यामुळे ऊसदर निश्चितीसाठी आयोजित करण्यात आलेली पहिली बैठक निष्फळ ठरली. मात्र, ऊसासाठी एफआरपी वाढवून देणार नाही तोपर्यंत साखर कारखाने सुरु होऊन देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून देण्यात आला होता.

कृषी कायद्यांविरोधात 5 नोव्हेंबरला रास्ता रोको आंदोलन येत्या 5 नोव्हेंबरला देशभरातील शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना महाराष्ट्रात आंदोलन करणार आहे. आम्ही रस्त्यावर उतरून ठिकठिकाण रस्ता रोखून धरू. किमान दोन तास शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन करावे, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले.

अतिवृष्टीमुळे ऊसतोडणीच्या कामात अडथळे

काही दिवसांपूर्वी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे शेतांमध्ये पाणी शिरले होते. हे पाणी अद्याप पूर्णपणे ओसरलेले नाही. परिणामी या शेतांमधील ऊस तोडणी करणे शक्य नाही. त्यामुळे सध्या रस्त्यांलगत असलेल्या शेतांमधील ऊस कापण्याचे काम सुरु आहे. मात्र, यंदाचा गाळप हंगाम अगोदरच लांबणीवर पडला आहे. दरवर्षी साधारण 15 ऑक्टोबरच्या आसपास गाळप हंगामाला सुरुवात होते. मात्र, यंदा अडचणींमुळे गाळप हंगाम अजूनही सुरु झालेला नाही. संबंधित बातम्या:

साखर कारखानदारांचा आडमुठेपणा; ऊस दर निश्चितीची पहिली बैठक निष्फळ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा संताप

(Raju Shetty demand to give 14 percent extra FRP to sugercane farmers)

Follow Us
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना.
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती.
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या...
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या....
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा.
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान.
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट.
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.