साखर कारखानदारांचा आडमुठेपणा; ऊस दर निश्चितीची पहिली बैठक निष्फळ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा संताप

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसाला 14 टक्के वाढीव एफआरपी द्यावा, अशी मागणी केली. | Sugercane FRP

साखर कारखानदारांचा आडमुठेपणा; ऊस दर निश्चितीची पहिली बैठक निष्फळ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा संताप
Follow us
| Updated on: Oct 31, 2020 | 8:15 PM

कोल्हापूर: यंदाच्या गाळप हंगामातील ऊसाचे दर निश्चित करण्यासाठी आयोजित करण्यात आलेली पहिली बैठक निष्फळ ठरली आहे. कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसाला 14 टक्के वाढीव एफआरपी द्यावा, अशी मागणी केली. मात्र, साखर कारखानदारांनी ही मागणी नाकारली. यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बैठकीतून निघून गेले. त्यामुळे ऊसदर निश्चितीसाठी आयोजित करण्यात आलेली पहिली बैठक निष्फळ ठरली. मात्र, ऊसासाठी एफआरपी वाढवून देणार नाही तोपर्यंत साखर कारखाने सुरु होऊन देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून देण्यात आला आहे. (Sugarcane FRP first meeting in Kolhapur)

ही बैठक निष्फळ ठरली असली तरी कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना एकरकमी देवू अस आश्वासन दिले आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या एफआरपीचे तुकडे होणार नाहीत. ही सकारात्मक बाब असली तरी तोडणी, ओढणी प्रमाणेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीमध्ये 14 टक्के वाढ मिळावी अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आग्रही मागणी आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात वाढीव मजुरीसाठी ऊसतोड कामगार आणि वाहतुकदारांचा संप सुरु होता. अखेर पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यावर तोडगा काढण्यात आला होता. या बैठकीअंती ऊसतोड कामगार आणि वाहतूकदारांना मजुरीत सरासरी 14 टक्के वाढ देण्याचा निर्णय झाला होता. या बैठकीला धनंजय मुंडे, बाळासाहेब थोरात, पंकजा मुंडे, सुरेश धस हे नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर बहुतांश ऊसतोड मजुरांच्या संघटनांनी संप मागे घेण्याची तयारी दर्शविली होती.

मात्र, अतिवृष्टीच्या फटक्यामुळे ऊसतोडणीला अजून वेगात सुरुवात झालेली नाही. काही दिवसांपूर्वी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे शेतांमध्ये पाणी शिरले होते. हे पाणी अद्याप पूर्णपणे ओसरलेले नाही. परिणामी या शेतांमधील ऊस तोडणी करणे शक्य नाही. त्यामुळे सध्या रस्त्यांलगत असलेल्या शेतांमधील ऊस कापण्याचे काम सुरु आहे. मात्र, यंदाचा गाळप हंगाम अगोदरच लांबणीवर पडला आहे. दरवर्षी साधारण 15 ऑक्टोबरच्या आसपास गाळप हंगामाला सुरुवात होते. मात्र, यंदा अडचणींमुळे गाळप हंगाम अजूनही सुरु झालेला नाही.

बैठक निष्फळ ठरल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक निष्फळ होताच स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून जवाहर साखर कारखाना आणि बाबवडे साखर कारखान्याचा ऊस रोखण्यात आला. यावेळी उमळवाड फाटा येथे स्वाभिमानाच्या कार्यकर्त्यांनी ट्रक आणि ट्रॅक्टरचे टायर्स जाळण्याचा प्रयत्न केला. संबंधित बातम्या:

मोठी बातमी: ऊसतोड मजुरांचा संप स्थगित; सुरेश धस यांची घोषणा

(Sugarcane FRP first meeting in Kolhapur)

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.