मुंबई : हिंदू धर्मामध्ये पवनपुत्र हनुमानाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. अडचणीच्या काळात हनुमान आपल्या भक्तांसाठी धावत येतात अशी मान्यता आहे. हिंदू पुराणात हनुमान भगवान शंकराचे अवतार आहेत असे मानले जाते. हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी तुलसीदासजींनी हनुमान चालीसा रचल्या. हनुमान चालीसाच्या पठणाने आपल्या आयुष्यातील दु:ख कमी होतात. तुलसीदासांनी बंदीगृहात ठेवण्यात आले होते. तेव्हा त्यांनी हनुमान चालीसा 40 दिवसामध्ये रचल्या होत्या.
हनुमान चालीसा वाचण्याची उत्तम वेळ
पुराणाच्या मते हनुमान चालीसा सकाळी किंवा संध्याकाळी वाचू शकता. सकाळी आंघोळ करून नंतर हनुमान चालीसाचे पठण करावे. जर तुम्हाला संध्याकाळी वाचायचे असेल तर तुम्ही स्वच्छ अंघोळ करुन याचे पठण करु शकता.
टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.
संबंधित बातम्या
Panchak Rules | पंचक म्हणजे काय? काय आहेत त्याचे नियम
Study Room Vastu | मुलांचं अभ्यासात मन लागत नाही? मग वास्तुत हे बदल नक्की करा
Hanuman Puja benefits : मनोभावे पूजा करा, संकटमोचक स्वत: मदतीला येतील