सांगलीच्या जागेवरून काँग्रेसची नाराजी, कोल्हापुरात पडसाद?; सतेज पाटील काय म्हणाले?

Satej Patil on Sangali Loksabha Election 2024 : कोल्हापुरात ठाकरे गटाकडून शाहू महाराजांना उमेदवारी; काँग्रेसची भूमिका काय? सांगलीतील काँग्रेस नेत्यांच्या नाराजीचे कोल्हापुरात पडसाद दिसणार? कोल्हापुरातील स्थिती काय? सतेज पाटील काय म्हणाले? वाचा सविस्तर...

सांगलीच्या जागेवरून काँग्रेसची नाराजी, कोल्हापुरात पडसाद?; सतेज पाटील काय म्हणाले?
Follow us
| Updated on: Apr 01, 2024 | 3:48 PM

ठाकरे गटाने आपली उमेदवार यादी जाहीर केली. यात सांगलीतून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यावर स्थानिक काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळाली. सांगलीतील काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्लीत जात आपली नाराजी बोलून दाखवली. या सगळ्याचे कोल्हापूर मतदारसंघातही पडसाद उमटत असल्याची राजकीय वर्तुळात होत आहे. यावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते, सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. सांगलीच्या जागेचे पडसाद कोल्हापूरमध्ये नाहीत. कोल्हापूरमध्ये शिवसेना ताकतीने काम करत आहे. उद्धव ठाकरे देखील शाहू महाराजांकडे येऊन गेले. मधल्या काळात भाजपच्या माध्यमातून काही अफवा पसरवल्या गेल्या. सांगलीबाबत वरिष्ठ पातळीकडून आम्ही अजूनही आशावादी आहोत, असं सतेज पाटील म्हणाले.

कोल्हापुरात पडसाद?

कोल्हापुरात ठाकरे गटाने शाहू महाराजांना उमेदवारी दिली आहे. शाहू महाराजांच्या प्रचारावर सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. ऑलरेडी आमचा प्रचाराचा एक राऊंड पूर्ण झाला आहे. कोल्हापूरच्या जनतेमध्ये कोल्हापूरच्या मातीतील छत्रपतीचं व्यक्तिमत्व दिल्लीला पाठवायचं, असा विचार आहे. त्यामुळे मोठ्या मताधिक्याने आमची सीट निवडून येईल, असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला.

काँग्रेसमध्ये काय राहिला आहे. हे सात जूनला महाराष्ट्र बघेल. महाराष्ट्रात काँग्रेस जिवंत आहे आणि ताकतीने उभी आहे. महाराष्ट्रात काँग्रेसची ताकद काय आहे हे स्पष्टपणे दिसेल, असं म्हणत अशोक चव्हाण यांच्या टीकेला सतेज पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

इंडिया आघाडीवर सतेज पाटील म्हणाले…

इंडिया आघाडी तयार झाल्यापासून नवीन पर्याय मिळाला आहे. 2019 ची आकडेवारी पाहिली तर काँग्रेस स्वबळावर निवडून येऊ शकत नाही. यामुळे सर्वांना धरून एक आकडा गाठायचा असं भाजप म्हणत आहे मात्र तो असा टाकताना गाठता येणार नाही. इंडिया आघाडी बद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. इंडिया आघाडी भाजपाला पर्याय होऊ शकतो असे लोकांना वाटू लागले आहे. महाराष्ट्राचा जनमत भाजपच्या बाजूने नाही हे भाजपाला समजले आहे. यामुळे ते महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका घेत आहेत, असं सतेज पाटील म्हणाले.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.