लघु उद्योजकांसाठी ठाकरे सरकारचं पॅकेज तयार, लवकरच घोषणा : उद्योग मंत्री

| Updated on: May 26, 2020 | 10:50 PM

लघु उद्योगांवरील व्याजाचे ओझे हलके करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी (Subhash Desai On Business Industry Package) दिली. 

लघु उद्योजकांसाठी ठाकरे सरकारचं पॅकेज तयार, लवकरच घोषणा : उद्योग मंत्री
Follow us on

मुंबई : केंद्र शासनाप्रमाणे राज्य शासनदेखील लघु-मध्यम-सूक्ष्म उद्योगांना मदत (Subhash Desai On Business Industry Package)  करण्याचे नियोजन करत आहेत. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर याबाबतची घोषणा केली जाईल. याद्वारे लघु उद्योगांवरील व्याजाचे ओझे हलके करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

कोरोनामुळे ठप्प झालेले उद्योगचक्र हळूहळू गतीमान होत आहे. सध्या राज्यात 50 हजार (Subhash Desai On Business Industry Package)  उद्योग सुरू झाले असून त्यात 13 लाख कामगार रुजू झाले आहेत. तर 43 हजार कारखान्यांनी परवाने मागितले आहेत.

दरम्यान, रेड झोनमधील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील व्यापार आणि दुकाने सुरू करण्याची मागणी होत आहे. याबाबत येत्या 1 जूननंतर शासन निर्णय घेऊ शकते, अशी माहिती सुभाष देसाईंनी दिली.

औद्योगिक कामगार ब्यूरो सुरू केला जाणार आहे. त्यासाठी पोर्टल तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. या पोर्टलद्वारे कुशल-अवकुश मनुष्यबळाची नोंदणी केली जाणार आहे. याद्वारे ज्या ठिकाणी कामगारांची गरज भासेल. त्याठिकाणी कामागरांचा पुरवठा केला जाणार आहे.

दरम्यान, मागील दोन वर्षात राज्य सरकारने बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावे घेतले. यामध्ये सहभागी झालेल्या तरुणांची उद्योग विभागाकडे नोंद आहेत. त्यातील तरुणांना देखील रोजगाराची संधी निर्माण करून दिली जाणार आहे.

विदेशी गुंतवणुकीसाठी एमआयडीकडे 40 हजार हेक्टर जमीन सर्व सुविधांसह सज्ज आहे. विदेशी कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी सुरू असलेल्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत. देश-विदेशातील लघु उद्योगांनी आपल्या प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठी महाराष्ट्राची निवड करावी, असे आवाहन उद्योगमंत्र्यांनी (Subhash Desai On Business Industry Package)  केले.


संबंधित बातम्या : 

फडणवीसांच्या आकडेवारीची सोप्या भाषेत चिरफाड करु : परिवहन मंत्री अनिल परब

28 हजार कोटी दिले ते नेहमीचेच, वेगळं पॅकेज नाही, भाजपने महाराष्ट्राला कर्जबाजारी केलं : नवाब मलिक