मुंबई मनपा आयुक्त नागपुरात, कोरोना रोखण्यासाठी इक्बाल चहल यांची खास रणनीती

| Updated on: Sep 04, 2020 | 8:27 PM

मुंबईत आम्ही सर्व्हेलान्स केलं, घरी जाऊन लोकांच्या चाचण्या केल्या. या पद्धतीने काम सुरु आहे.

मुंबई मनपा आयुक्त नागपुरात, कोरोना रोखण्यासाठी इक्बाल चहल यांची खास रणनीती
Follow us on

नागपूर : “मुंबईत केलं त्याप्रमाणे नागपुरात काम करण्याची गरज आहे”, असं मुंबईचे आयुक्त इक्बाल चहल म्हणाले (Mumbai Commissioner Iqbal Chahal On Nagpur Tour). ते  आज नागपूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी नागपुरातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला.

“कोरोनाचा लढा किती दिवस चालणार हे सांगणे कठीण आहे. आकडा शून्यावर कधी येईल हे सांगणे कठीण आहे. मेडिकलचे चार स्तंभ आपल्याला मजबूत करायचे आहेत. ते म्हणजे टेस्ट करणे, कॉटेक्ट ट्रेसिंग करणे, क्वॉरंटाईन करणे आणि ट्रीटमेंट करणे हे महत्त्वाचं आहे”, असं ते म्हणाले.

“मुंबईत आम्ही सर्व्हेलान्स केलं, घरी जाऊन लोकांच्या चाचण्या केल्या. या पद्धतीने काम सुरु आहे. तेच सगळं नागपुरात करण्याची गरज आहे”, असंही त्यांनी सांगितलं.

“प्रत्येक शहरात वेगवेगळी कारणं आहेत. रुग्णाला लगेच रिपोर्ट मिळाला पाहिजे आणि त्याच्यावर ट्रीटमेंट सुरु झाली पाहिजे. उशिरा रिपोर्ट मिळाले, तर ट्रीटमेंट उशिरा होते आणि त्यामुळे मृत्यू वाढतो “.

“सुरुवातीला मुंबईमध्ये सुद्धा मृत्यूदर जास्त होता. तो आता कमी झाला आहे. बेड उपलब्ध करुन देण्यासाठी उपाय करणे, रुग्णाला बेड मिळणे आवश्यक आहे. टेस्टिंग वाढल्या तर रुग्ण वाढतील”, असं इक्बाल चहल यावेळी म्हणाले.

Mumbai Commissioner Iqbal Chahal On Nagpur Tour

संबंधित बातम्या :

Special Report | पुणे, नागपूर, कोल्हापूर, सोलापूरमध्ये आरोग्य यंत्रणा खरंच सक्षम?

नागपूर आयुक्तांचा कामाचा धडाका, कोव्हिड सेंटरला अचानक भेट, नंतर खासगी रुग्णालयातील डॉक्टरांसोबत बैठक