मुंबई-पुण्यात दिलेल्या अंशत: सवलतीही रद्द, घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढल्याने निर्णय

| Updated on: Apr 21, 2020 | 8:22 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यासाठी (Mumbai Pune Lockdown) लॉकडाऊनमध्ये आणलेली शिथिलता मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे महानगर क्षेत्रासाठी रद्द केली आहे.

मुंबई-पुण्यात दिलेल्या अंशत: सवलतीही रद्द, घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढल्याने निर्णय
Follow us on

मुंबई : कोरोना विषाणूंचा वाढता फैलाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यासाठी (Mumbai Pune Lockdown) लॉकडाऊनमध्ये आणलेली शिथिलता मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे महानगर क्षेत्रासाठी रद्द केली आहे. या भागात अधिक काटेकोरपणे लॉकडाऊन पाळले जावे असे प्रशासनाला निर्देश दिले आहेत.

येत्या 20 एप्रिलपासून लॉकडाऊन बाबतीत काही प्रमाणात शिथिलता (Mumbai Pune Lockdown) आणण्याचे राज्य सरकारने ठरवले होते. मात्र काही नागरिकांनी मुक्तपणे व्यवहार सुरु केले. यावर मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना उद्देशून केलेल्या लाईव्ह प्रसारणातही नाराजी व्यक्त केली होती तसेच निर्बंध न पाळल्यास शिथिलता रद्द केली जाईल असा इशाराही दिला होता.

यानुसार लॉकडाऊन संदर्भात राज्य शासनाने 17 एप्रिल रोजी काढलेल्या सर्वसमावेशक अधिसूचनेतील नव्याने शिथिल केलेल्या बाबी रद्द करणारी दुरुस्ती आज करण्यात आली. मुंबई महानगर आणि पुणे महानगर क्षेत्रासाठी ती लागू असेल. म्हणजेच 17 एप्रिलला सुधारित अधिसूचनेपूर्वीची परिस्थिती मुंबई महानगर आणि पुणे महानगरसाठी लागू राहील. उर्वरित राज्यात 17 एप्रिलप्रमाणे शिथिलता राहील.

ई कॉमर्स कंपन्यांना इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची वाहतूक करण्यास दिलेली शिथिलताही रद्द करण्यात आली आहे. त्यांना केवळ अन्न, जीवनावश्यक वस्तू, औषधी, आणि वैद्यकीय उपकरणे यांचीच वाहतूक करता येईल.

फरसाण, मिठाईची दुकाने, कन्फेक्शनरी दुकाने हेही मुंबई-पुण्यात पूर्वीच्या आदेशाप्रमाणे बंदच राहतील. बांधकामे देखील मुंबई आणि पुण्यात बंदच राहतील. या भागांतील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून वर्क फ्रॉम होम पद्धतीनेच काम करून (Mumbai Pune Lockdown) घ्यावे.

संबंधित बातम्या :

नागपुरातील वाढत्या कोरोनावरुन आयुक्तांकडे बोट, आता तुकाराम मुंढेंचं महापौरांना उत्तर

इंग्लंडमध्ये कंपन्यांनी सुट्टीवर पाठवलेल्या कर्मचाऱ्यांना सरकार पगार देणार, कोरोनामुळे ‘हे’ पहिल्यांदाच घडतंय