AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत, हार्बर लाईनवरही बिघाड, अवकाळी पावसामुळे मुंबईची तारांबळ!

मुंबई तसेच उपनगरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे मुंबई तसेच उपनगरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाचा मुंबईच्या लोकलवरही परिणाम झाला.

मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत, हार्बर लाईनवरही बिघाड, अवकाळी पावसामुळे मुंबईची तारांबळ!
mumbai rain update
| Updated on: May 06, 2025 | 11:39 PM
Share

Mumba Rain Update : मुंबई तसेच उपनगरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे मुंबई तसेच उपनगरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाचा मुंबईच्या लोकलवरही परिणाम झाला. मिळालेल्या माहितीनुसार या अवकाळी पावसामुळे मध्य रेल्वे मार्गावर लोकल उशिराने धावत आहेत.

मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत

मध्य रेल्वे मार्गावर लोकल तब्बल 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत. सीएसएमटी ते कर्जतकडे जाणारी लोकलही उशिराने धावत आहेत. एकंदरीत अवकाळी पासामुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या मते जोरदार वारा आणि पावसामुळे ओव्हरहेड वायर्स ट्रीपिंगच्या समस्या उद्भवत आहेत. यामुळे हार्बर लाईन 5-7 मिनिटे उशिराने धावत असल्याची माहिती आहे.

ठाणे-वाशी हार्बर मार्गावरील लोकल सेवा काही काळासाठी ठप्प

एकीकडे पावसामुळे लोकल उशिराने धावत आहेत. तर दुसरीकडे ठाणे ते वाशी हार्बर मार्गावर तांत्रिक बिघाड पाहायला मिळाला. या बिघाडामुळे ठाणे-वाशी हार्बर मार्गावरील लोकल सेवा काही काळासाठी ठप्प झाली होती. रात्री रात्रीच्या नऊ ते दहाच्या दरम्यान तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला. त्यानंतर आता ही रेल्वेसेवा पूर्वपदावर आली आहे.

अंबरनाथ शहरात बत्ती गुल

अवकाळी पासवाचा फटका अंबरनाथ शहराला बसला आहे. अंबरनाथला अवकाळी पावसाची सुरुवात होताच सर्वत्र सोसाट्याचा वारा अन धुळीचं वादळ निर्माण झालं. त्यामुळे अंबरनाथ शहरात बत्ती गुल झाली. येथे काही काळासाठी वीज गेली होती.

ठाण्यातही पाऊस

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार ठाण्यात पावसाने हजेरी लावली. जून महिन्याआधीच ठाण्यात पावसाने येथे हजेरी लावली आहे. उकाड्याने हैराण ठाणेकरांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. मात्र या पावसामुळे ठाणेकरांची काही काळासाठी तारांबळ उडालेली पाहायला मिळाली. गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत होता. आता पडलेल्या पावसामुळे तापमानात घट होणार आहे.

ठाण्यात दुर्घटना तिघांचा मृत्यू

कल्याणमध्येही पावसाने हजेरी लावली आहे. येथे जोरदार पासवामुळे एक झाड रिक्षावर कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एका रिक्षाचालकासह दोन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या अवकाळी पासामुळे घराकडे परतणाऱ्या चाकरमाण्यांची तारांबळ उडाली. तर याच पावसामुळे येथे काही काळासाठी वीज गेली होती.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.