AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भरकार्यक्रमात चिठ्ठी मिळाली, भाषण अर्ध्यावर सोडून मोदी निघाले

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सीमेवर संवेदनशील परिस्थिती बनली आहे. दिल्लीत याबाबत उच्चस्तरीय बैठका सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सकाळी एका कार्यक्रमाला हजेरी लावली. हा कार्यक्रम सुरु असताना मोदींना एक चिठ्ठी आणून देण्यात आली. त्यांनी भाषण थांबवून चिठ्ठी वाचली आणि त्यानंतर भाषण सोडून ते तातडीने निघून गेले. मोदी उच्चस्तरीय बैठकीसाठीच रवाना झाले असावे […]

भरकार्यक्रमात चिठ्ठी मिळाली, भाषण अर्ध्यावर सोडून मोदी निघाले
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM
Share

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सीमेवर संवेदनशील परिस्थिती बनली आहे. दिल्लीत याबाबत उच्चस्तरीय बैठका सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सकाळी एका कार्यक्रमाला हजेरी लावली. हा कार्यक्रम सुरु असताना मोदींना एक चिठ्ठी आणून देण्यात आली. त्यांनी भाषण थांबवून चिठ्ठी वाचली आणि त्यानंतर भाषण सोडून ते तातडीने निघून गेले.

मोदी उच्चस्तरीय बैठकीसाठीच रवाना झाले असावे असा अंदाज लावण्यात येत आहे. कारण, पाकिस्तानच्या वायूसेनेकडून भारताच्या हवाई हद्दीत घुसखोरी करण्यात आल्यानंतर दिल्लीतील हालचालींना वेग आला. केंद्रीय गृहमंत्रालयात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यानंतर मोदींच्या निवासस्थानीही बैठक झाली.

दिल्लीतील विज्ञान भवनात राष्ट्रीय युवा संसद कार्यक्रमाला मोदींनी हजेरी लावली. एअर स्ट्राईकनंतरचा हा मोदींचा पहिलाच सरकारी कार्यक्रम होता. या कार्यक्रमात जाताच मोदी-मोदीचे नारे लावण्यात आले. क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंहही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

भारताने पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये जाऊन एअर स्ट्राईक केल्यामुळे पाकिस्तान खवळला आहे. बदला घेण्याची भाषा पाकिस्तानकडून केली जात आहे. जम्मू काश्मीरमधील नौसेरा भागात पाकिस्तानने विमाने घुसवून भीती दाखवण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय वायूसेनेने पाकिस्तानचं F-16 हे विमान पाडल्याचं बोललं जातंय.

व्हिडीओ पाहा :

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.