सध्या नुसती ‘प्रॅक्टिस’, ‘रिअल’ अजून बाकीच : मोदी

| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

नवी दिल्ली : सध्या नुसती प्रॅक्टिस सुरु आहे, रिअल अजून बाकी आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील वाढते तणाव पाहता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे विधान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. नवी दिल्लीतील विज्ञान भवनातील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. VIDEO : […]

सध्या नुसती प्रॅक्टिस, रिअल अजून बाकीच : मोदी
Follow us on

नवी दिल्ली : सध्या नुसती प्रॅक्टिस सुरु आहे, रिअल अजून बाकी आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील वाढते तणाव पाहता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे विधान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. नवी दिल्लीतील विज्ञान भवनातील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.

VIDEO : पाहा पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमके काय म्हणाले?

विज्ञान भवनातील याच कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताच्या वाटचालीवरही भर दिला. ते म्हणाले, “विज्ञान क्षेत्रातील आपल्या संस्थांना भविष्यातील गरजेनुसार बदलावं लागेल. आपल्या मुलभूत ताकद निर्माण करत असतानाच, भविष्यातील समाज आणि आर्थिक गोष्टींनुसार वाटचाल करावी लागेल.”

भारत आज जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्थेचा देश बनला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

भारतीय शास्त्रज्ञांनी कायमच मानवतेच्या भल्यासाठी आपलं योगदान दिलं, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी विज्ञान भवनातून भारतीय शास्त्रज्ञांचं कौतुक केलं.

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील तणाव दिवसेंदिवस वाढत असताना, भारतासाठी काहीशी आनंदाची बातमी म्हणजे, पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेची घोषणा पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी केली आहे. उद्या सकाळी अभिनंदन हे वाघा बॉर्डरहून भारतात परततील.

संबंधित बातम्या :

भारतीय विंग कमांडरला उद्याच सोडणार, इम्रान खान बिथरला!

युद्ध हवं की नको, राज ठाकरेंकडून मोदींना मोठा पर्याय

पुलवामा हल्ल्यातील वीरपत्नीचं दुर्दैव, पैशासाठी दिरासोबत लग्नासाठी दबाव

घ्या पुरावा! भारताने पाडलेल्या पाक विमानाचे अवशेष सापडले

पाकची 20 विमानं 10 किमी भारताच्या हद्दीत घुसली!