AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Virus : धक्कादायक! 167 कोरोना संशयित रुग्ण बेपत्ता, शोध सुरु

जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला असताना भारतात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पंजाबमधून तब्बल 167 कोरोना संशयित रुग्ण बेपत्ता (punjab corona patient missing) झाले आहेत.

Corona Virus : धक्कादायक! 167 कोरोना संशयित रुग्ण बेपत्ता, शोध सुरु
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Mar 18, 2020 | 4:08 PM
Share

चंदीगड : जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला असताना भारतात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पंजाबमधून तब्बल 167 कोरोना संशयित रुग्ण बेपत्ता (punjab corona patient missing) झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने कोरोना संशयित रुग्ण बेपत्ता झाल्याने प्रशासनालाही धडकी भरली आहे. या बेपत्ता संशयित रुग्णांचा कसून शोध घेतला जात आहे. बेपत्ता असलेल्या 29 संशयितांना शोधले असून 167 कोरोना संशयित बेपत्ता आहेत, असं सांगितलं जात (punjab corona patient missing) आहे.

हे 167 बेपत्ता कोरोना संशयित रुग्ण नुकतेच परदेश दौऱ्यावरुन परतले होते. पंजाबच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना कोरोना संशयितांची यादी दिली होती. आता आरोग्य विभाग या बेपत्ता लोकांचा शोध घेत आहे. जेणेकरुन त्यांना सूरतमध्ये आयसोलेशनमध्ये ठेवले जाऊ शकते.

“परदेशातून परतलेल्या लोकांची माहिती काढण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली आहेत. पोलिसांवर 119 लोकांना शोधण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांनी आतापर्यंत 12 लोकांना शोधून काढले आहे. तर आरोग्य विभागावर 77 लोकांना शोधून काढण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. आरोग्य विभागानेही 17 संशयितांना शोधून काढले आहे”, असं सिव्हिल सर्जन डॉक्टर राजेश कुमार बग्गा यांनी सांगितले.

डॉक्टर बग्गा म्हणाले, “लुधियानामध्ये 167 लोक बेपत्ता आहेत. आतापर्यंत संशयितांची माहिती मिळत नाही याचे कारण त्यांच्या पासपोर्टमधील नाव, पत्ता आणि नंबर खोटे असू शकते. असे वाटते की पत्ते आणि फोन नंबरमध्ये बदल केले आहेत. आमची पथके सक्रीय असून त्यांचा शोध घेत आहेत. लवकरच त्यांचा शोध लागेल.”

कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत असताना 14 मार्च रोजी पंजाबमधून एक धक्कादायक माहिती समोर आली होती. आरोग्य विभागाकडून मेडिकल बुलेटिनमध्ये म्हटले होते की, आंतरराष्ट्रीय प्रवास करणारे 335 लोक बेपत्ता आहेत. बाहेरुन येणारे 335 लोक गायब आहेत. त्यांची स्क्रीनिंग झाली नाहीये आणि ते आता कुढे याचा शोध घेत आहेत.

Follow Us
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर.

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?.

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?

तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून...

तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून..