महाराष्ट्राच्या कृषी योजनांचे तेलंगणाच्या कृषिमंत्र्यांकडून कौतुक

| Updated on: Nov 04, 2020 | 6:14 PM

तेलंगणाचे कृषीमंत्री एस. निरंजन रेड्डी यांनी महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन महाराष्ट्राच्या कृषी योजनांचे कौतुक केले.

महाराष्ट्राच्या कृषी योजनांचे तेलंगणाच्या कृषिमंत्र्यांकडून कौतुक
Follow us on

मुंबई :  तेलंगणाचे कृषीमंत्री एस. निरंजन रेड्डी यांनी महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन महाराष्ट्राच्या कृषी योजनांचे कौतुक केले. सह्याद्री अतिथीगृहावर रेड्डी यांनी कृषीमंत्र्यांची भेट घेतली. फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, तेलंगणाच्या पणन संचालक श्रीमती लक्ष्मी यावेळी उपस्थित होते.  (Telangana Agriculture Minister S. niranjan reddy meet Dada Bhuse)

महाराष्ट्र फळबाग लागवडीत देशात प्रथम क्रमांकावर असून त्या बाबतीत महाराष्ट्राकडून मार्गदर्शन घेण्यासाठी विशेष भेटीवर आल्याचे तेलंगणाचे कृषीमंत्री एस. निरंजन रेड्डी यांनी सांगितलं. शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासन विविध योजना राबवित असून या क्षेत्रात तेलंगणा राज्याच्या कृषी विभागाच्या अभिनव योजनांचा अभ्यास केला जाईल, असं महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितलं.

कृषी क्षेत्रात महाराष्ट्राकडून शिकण्यासारखे खूप असून महाराष्ट्र दौरा त्यासाठी लाभदायी ठरेल, असे कृषिमंत्री रेड्डी यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ‘विकेल ते पिकेल’ या अभियानाचे विशेष कौतुक त्यांनी यावेळी केले. तसंच त्यांनी तेलंगणा राज्यात शेतकऱ्यांसाठी राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी सादरीकरणादरम्यान महाराष्ट्रातील विविध कृषी योजनांची माहिती दिली.

(Telangana Agriculture Minister S. niranjan reddy meet Dada Bhuse)

संबंधित बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपर्यंत आर्थिक मदत देऊ, दादा भुसे यांचे आश्वासन

उस्मानाबाद तालुक्यात फळबागांचे शून्य टक्के नुकसान, जिल्हा प्रशासनाचा अजब पंचनामा