पाकिस्तानच्या लढाऊ विमानांसाठी इंधन नाही, म्हणे भारताचा बदला घेणार

| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये युद्धाची स्थिती आहे. भारताने एअर स्ट्राईकनंतर केल्यानंतर पाकिस्तानने मूर्खपणा करत भरदिवसा त्यांची विमानं भारताच्या हवाई हद्दीत घुसवली. पाकिस्तान वायूसेनेच्या विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करत बॉम्ब फेकण्याचा प्रयत्न केला. पण सतर्क असलेल्या वायूसेनेने ही विमानं पळवून लावली. पण पाकिस्तानकडून आता काही खळबळजनक दावे करण्यात आले आहेत. पाकिस्तानची मान शरमेने जाणारी बाब […]

पाकिस्तानच्या लढाऊ विमानांसाठी इंधन नाही, म्हणे भारताचा बदला घेणार
Follow us on

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये युद्धाची स्थिती आहे. भारताने एअर स्ट्राईकनंतर केल्यानंतर पाकिस्तानने मूर्खपणा करत भरदिवसा त्यांची विमानं भारताच्या हवाई हद्दीत घुसवली. पाकिस्तान वायूसेनेच्या विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करत बॉम्ब फेकण्याचा प्रयत्न केला. पण सतर्क असलेल्या वायूसेनेने ही विमानं पळवून लावली. पण पाकिस्तानकडून आता काही खळबळजनक दावे करण्यात आले आहेत.

पाकिस्तानची मान शरमेने जाणारी बाब समोर आली आहे. पाकिस्तानने एक उच्चस्तरीय बैठक घेतली. यामध्ये धक्कादायक बाब समोर आली. पाकिस्तानच्या लढाऊ विमानांसाठी पुरेसा इंधनसाठाच उपलब्ध नसल्याचं समजतंय. खुद्द पाकिस्तानी मीडियानेच याबाबत वृत्त दिलंय. त्यामुळे भारताकडून बदला घेण्याची भाषा करणाऱ्या पाकिस्तानने स्वतःची परिस्थिती पाहिलेलीच नाही का, असा प्रश्न निर्माण होतोय.

भारताने पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये जाऊन एअर स्ट्राईक केल्यामुळे पाकिस्तान खवळला आहे. बदला घेण्याची भाषा पाकिस्तानकडून केली जात आहे. जम्मू काश्मीरमधील नौसेरा भागात पाकिस्तानने विमाने घुसवून भीती दाखवण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय वायूसेनेने पाकिस्तानचं F-16 हे विमान पाडल्याचं बोललं जातंय.

देशातील विमानतळं आणि शहरांमध्ये हायअलर्ट

खबरदारीचा उपाय म्हणून देशातील काही विमानतळे आणि महत्त्वाच्या शहरांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आलाय. राजस्थानमधील जैसलमेर हे पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेलं शहर आहे. या शहरातील गावं खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवाय गुजरातमधील पूँछमध्ये लोकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आलाय. शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

व्हिडीओ पाहा :